शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलसाठ्यात फक्त एक टक्कावाढ

By admin | Updated: June 30, 2017 02:27 IST

जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे

विभागातील जलाशयात केवळ ११ टक्के साठा : जूनमध्ये मान्सूनची चाल संथ लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस अजूनही पडलेला नाही. मान्सूनची चाल सुस्तावल्याने एकीकडे उकाडा वाढला आहे तर दुसरीकडे जलाशयेसुद्धा कोरडी पडली आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर विभागातील मोठ्या जलाशयांमध्ये केवळ १० टक्के जलसाठा शिल्लक होता. आता महिना संपत आला तरी जलसाठ्यात केवळ एक टक्काच भर पडली आहे. नागपूर विभागातील १८ मोठ्या धरणांमध्ये आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी (११ टक्के) इतका जलसाठा शिल्लक आहे. आजच्या तारखेचाच विचार केला असता गेल्या पाच वर्षात सर्वात कमी जलसाठा याच वर्षी असल्याचे दिसून येते. जलसंपदा विभागाअंतर्गत नागपूर विभागात पाटबंधारे प्रकल्पांचे १८ मोठे तलाव आहेत. यातील एकूण पाणीसंचयनाची क्षमता २९६४.४ दलघमी इतकी आहे. यापैकी आजच्या तारखेला केवळ ३२८ दलघमी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये सर्वात मोठे धरण असलेल्या तोतलाडोह धरणात केवळ ३४ दलघमी (३ टक्के) इतका पाणीसाठा आहे. कामठी खैरी ३८ टक्के, रामटेक ११ टक्के, लोवर वडगाव १८ टक्के, इडियाडोह १४ टक्के, सिरपूर १ टक्के, पूजारी टोला २३ टक्के, असोलामेंढा ४० टक्के, दिना १३ टक्के, बोर १४ टक्के, धाम १६ टक्के, पोथरा २५ टक्के, लोवर वर्धा टप्पा -१ येथे १६ टक्के, बावनथडी १२ आणि धापेवाडा बॅरेज टप्पा २ येथे केवळ १ टक्का इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा येथील गोसीखुर्द टप्पा-१, नागपुरातील गोंदिया येथील कालीसरार या तलावातील पाणीसाठा संपलेला आहे. गेल्यावर्षी आजच्याच तारखेला १९ टक्के साठा गेल्या वर्षी आजच्याच तारखेला या १८ ही तलावात एकूम पाणीसाठा ६३२ दलघमी (१९ टक्के) इतका होता. तसेच २०१२ मध्ये ७४५ दलघमी, २०१३ मध्ये १२१५ दलघमी, २०१४ मध्ये १४३१ दलघमी आणि २०१५ मध्ये ९३० दलघमी इतका पाणीसाठी आजच्या तारखेला २९ जून) रोजी होता.