शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केवळ चालानपासून बचावासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:26 IST

- आयएसआय मार्कविना सर्रास विक्री : गंभीर अपघाताचा धोका जास्त नागपूर : दुचाकी वाहनावरून वाहतूक करताना सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे ...

- आयएसआय मार्कविना सर्रास विक्री : गंभीर अपघाताचा धोका जास्त

नागपूर : दुचाकी वाहनावरून वाहतूक करताना सुरक्षेसाठी हेल्मेट महत्त्वाचे आणि आवश्यक आहे. अपघातात हेल्मेटमुळे डोक्याला गंभीर इजा होत नाही आणि वाहनचालक सुरक्षित राहतो. पण अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ वाहतूक पोलिसांच्या चालानपासून बचावासाठी सुरक्षित आयएसआय हेल्मेटऐवजी अनेकजण ‘टोपी हेल्मेट’चा उपयोग करताना रस्त्यावर दिसून येत आहेत. अशा हेल्मेटच्या उपयोगकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी आता पुढे आली आहे.

नंदनवन येथील श्री साई ऑटोमोबाईल्सचे संचालक अशोक आणि विजय आमधरे म्हणाले, आम्ही केवळ आयएसआय मार्कचे आणि संपूर्ण सुरक्षा देणाऱ्या हेल्मेटची विक्री करतो. पण सध्या रस्त्यावर गुणवत्ता नसलेल्या आयएसआय मार्क नसलेल्या ‘टोपी हेल्मेट‘ची सर्रास विक्री होत आहे. त्यामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. पण पोलिसांच्या चालानपासून बचावाची लोकांची कवायत दिसून येत आहे. पोलीस आणि प्रशासनाने अशा हेल्मेटच्या विक्रीवर प्रतिबंध आणावा. देशात दुचाकी वाहनचालकांना केवळ भारतीय मानक ब्यूरोतर्फे प्रमाणित अर्थात आयएसआय हेल्मेटची निर्मिती आणि विक्री करावी, असे केंद्र सरकारचे आदेश आहेत. याकरिता एक नियमावली जारी केली आहे. पण त्याचा फारसा परिणाम वाहनचालकांवर होताना दिसत नाही. आयएसआय मार्क नसलेले स्वस्त ‘टोपी हेल्मेट’ लोक वापरत आहेत. अशा प्रकारे ते स्वत:च आपला जीव धोक्यात टाकत आहेत.

वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी

ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत संघटन मंत्री गजानन पांडे म्हणाले, टोपी हेल्मेट घालून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. हे हेल्मेट वाहतुकीच्या नियमाविरुद्ध आहे. केवळ पोलिसांची फसवणूक करण्यासाठी लोकांनी टोपी हेल्मेट घालण्याची युक्ती अवलंबविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब घातक आहे.

वाहनचालक महेंद्र आदमने म्हणाले, फुल हेल्मेट घातल्याने समोरचे पाहण्यास आणि ऐकण्यास तसेच श्वास घेण्यास त्रास होतो. याशिवाय डोक्यातून घाम येतो. त्यामुळे टोपी हेल्मेटचा उपयोग करतो. त्यामुळे त्रास होत नाही.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटची विक्री करणाऱ्यांवर भारतीय मानक ब्यूरोला कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आयएसआय प्रमाणित हेल्मेटची निर्मिती आणि विक्री करण्याचे या विभागाचे निर्देश आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, प्रारंभी देशात दुय्यम दर्जाच्या हेल्मेट निर्मितीवर प्रतिबंध लावण्याची गरज आहे. अशा हेल्मेटची निर्मिती न झाल्यास बाजारात विक्रीसाठी येणार नाहीत आणि कमी गुणवत्तेच्या हेल्मेटचा उपयोग होणार नाही.