शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

"लोकशाहीच्या नावाने ओरड करणारे सभागृहात केवळ ४६ मिनिटेच उपस्थित"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 20:44 IST

Nagpur News जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले.

ठळक मुद्दे वडिलांना घाबरलो नाही, तर आदित्यला काय घाबरणार ?

योगेश पांडे नागपूर : हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. जे लोक रोज लोकशाहीबाबत ओरड करतात ते सभागृहात केवळ ४६ मिनिटे उपस्थित होते. यावरून त्यांचे लोकशाहीवर खरोखर किती प्रेम आहे हे लक्षात येत आहे, या शब्दांत फडणवीस यांनी ठाकरेंबाबत वक्तव्य केले. विधीमंडळ अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

हिवाळी अधिवेशनात खूप काम झाले. विरोधकांनी कामावर सुरुवातीला बहिष्कारदेखील घातला. मात्र काम पूर्ण झाले. विरोधकांनी विविध माध्यमातून आरोप केले, मात्र आम्ही त्यांना उघडे पाडले. आदित्य ठाकरे यांनी वयाचा दाखला देत काही आरोप केले. मात्र आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. आम्ही राज्याच्या विकासाकडे लक्ष देत आहोत. आम्ही त्यांच्या वडिलांनाच घाबरलो नाही तर त्यांना काय घाबरू. त्यांच्या नाकाखालून ५० आमदार काढले तेव्हा मुंबईत आग लागेल असे इशारे देण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात आगपेटीची काडीदेखील पेटली नाही, असे फडणवीस म्हणाले. अजित पवारांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला. आमचे मिशन बारामती आहेच. पण मिशन महाराष्ट्रदेखील आहे. बहुतेक बावनकुळे या मिशनसाठी बारामतीला गेल्यामुळेच अजित पवार यांना राग आला असावा असे ते म्हणाले.

विरोधकांनी तारतम्य बाळगावे : मुख्यमंत्री

यंदाच्या अधिवेशनात विरोधक सभागृहापेक्षा बाहेरच जास्त बोलले. विविध मुद्दे उकरून काढत त्यांनी विविध आरोप करण्याचे प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाही. विधानसभा अध्यक्षांनी खूप चांगले काम केले. कायद्याचे ते तज्ज्ञ आहेत. असे असतानादेखील त्यांच्यावर पातळी सोडून आरोप करण्यात आले. विरोधकांनी कमीतकमी अध्यक्षांबाबत बोलताना तरी तारतम्य बाळगावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांचा सावळागोंधळ अधिवेशनात समोर आला व गोंधळलेली स्थिती दिसून आली, असेदेखील त्यांनी प्रतिपादन केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन