शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

न्यायव्यवस्था राज्यघटनेला पुढे नेत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:08 IST

देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे,

न्या. भूषण गवई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरणनागपूर : देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तैलचित्राचे मंगळवारी न्या. गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रभारी महाधिवक्ता रोहित देव, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील व हायकोर्ट एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फरकाडे उपस्थित होते. न्या. गवई यांनी भारतीय राज्यघटनेची महानता समजावून सांगितली. ही राज्यघटना समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्यायावर आधारित आहे. राज्यघटनेमुळे भारत आजही एकसंघ आहे. भारताच्या एक दिवस आधी स्वतंत्र झालेल्या शेजारी देशाने मात्र आतापर्यंत अनेकदा अस्थिरता सहन केली आहे. राज्यघटनेतील आर्टिकल ३२ चे जनक बाबासाहेब आहेत. त्यांनी विरोधाला सक्षमपणे तोंड देऊन हे आर्टिकल कायम ठेवले. हे आर्टिकल अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध दाद मागण्याचा मार्ग आहे. यामुळे ते राज्यघटनेचा आत्मा आहे. यातून सामान्य जनतेला न्याय मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.राजकीय, आर्थिक व सामाजिक समतेशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. बाबासाहेब खरे देशभक्त होते. मी पहिला व शेवटचा भारतीयच आहे असे ते सांगत. त्यांनी देशाला एकत्र बांधून ठेवणारी घटना दिली असे विचारही न्या. गवई यांनी व्यक्त केले.बाबासाहेब मानवतावादाचे पुढारी होते. त्यांना एका जाती-धर्मात बांधून ठेवू नका, असे आवाहन अ‍ॅड. रोहित देव यांनी केले. पाषाणातील कविता संबोधल्या जाणाऱ्या हायकोर्टाच्या इमारतीचे सौंदर्य बाबासाहेबांच्या तैलचित्रामुळे वाढलेय, असे अ‍ॅड. अरुण पाटील यांनी तर, बाबासाहेबांचे विचार अंगिकारणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे विनोद फरकाडे यांनी सांगितले. हायकोर्ट बार असोसिएशन, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, सरकारी वकील कार्यालय व हायकोर्ट कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.ज्ञानाचा मुक्त प्रसार करा - न्या. धर्माधिकारीसहज प्राप्त होणारे ज्ञान डोक्यात तर, परिश्रमपूर्वक मिळालेले ज्ञान हृदयात जात असते. बाबासाहेबांनी ज्ञानाचे बीज हृदयात जोपासून त्याचा वटवृक्ष केला व या वटवृक्षाची बीजे समाजापर्यंत पोहोचविली. याप्रमाणे सर्वांनी ज्ञानाचा मुक्त प्रसार केला पाहिजे, असे विचार न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.