शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

न्यायव्यवस्था राज्यघटनेला पुढे नेत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 03:08 IST

देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे,

न्या. भूषण गवई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरणनागपूर : देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला सतत पुढे नेण्याचे कार्य करीत आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले.उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तैलचित्राचे मंगळवारी न्या. गवई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी, प्रभारी महाधिवक्ता रोहित देव, हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील व हायकोर्ट एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष विनोद फरकाडे उपस्थित होते. न्या. गवई यांनी भारतीय राज्यघटनेची महानता समजावून सांगितली. ही राज्यघटना समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्यायावर आधारित आहे. राज्यघटनेमुळे भारत आजही एकसंघ आहे. भारताच्या एक दिवस आधी स्वतंत्र झालेल्या शेजारी देशाने मात्र आतापर्यंत अनेकदा अस्थिरता सहन केली आहे. राज्यघटनेतील आर्टिकल ३२ चे जनक बाबासाहेब आहेत. त्यांनी विरोधाला सक्षमपणे तोंड देऊन हे आर्टिकल कायम ठेवले. हे आर्टिकल अधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध दाद मागण्याचा मार्ग आहे. यामुळे ते राज्यघटनेचा आत्मा आहे. यातून सामान्य जनतेला न्याय मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.राजकीय, आर्थिक व सामाजिक समतेशिवाय लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. बाबासाहेब खरे देशभक्त होते. मी पहिला व शेवटचा भारतीयच आहे असे ते सांगत. त्यांनी देशाला एकत्र बांधून ठेवणारी घटना दिली असे विचारही न्या. गवई यांनी व्यक्त केले.बाबासाहेब मानवतावादाचे पुढारी होते. त्यांना एका जाती-धर्मात बांधून ठेवू नका, असे आवाहन अ‍ॅड. रोहित देव यांनी केले. पाषाणातील कविता संबोधल्या जाणाऱ्या हायकोर्टाच्या इमारतीचे सौंदर्य बाबासाहेबांच्या तैलचित्रामुळे वाढलेय, असे अ‍ॅड. अरुण पाटील यांनी तर, बाबासाहेबांचे विचार अंगिकारणे हीच त्यांना आदरांजली ठरेल, असे विनोद फरकाडे यांनी सांगितले. हायकोर्ट बार असोसिएशन, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन, सरकारी वकील कार्यालय व हायकोर्ट कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला.ज्ञानाचा मुक्त प्रसार करा - न्या. धर्माधिकारीसहज प्राप्त होणारे ज्ञान डोक्यात तर, परिश्रमपूर्वक मिळालेले ज्ञान हृदयात जात असते. बाबासाहेबांनी ज्ञानाचे बीज हृदयात जोपासून त्याचा वटवृक्ष केला व या वटवृक्षाची बीजे समाजापर्यंत पोहोचविली. याप्रमाणे सर्वांनी ज्ञानाचा मुक्त प्रसार केला पाहिजे, असे विचार न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.