शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडावरील निर्णय राखीव

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 12, 2023 16:45 IST

Nagpur News सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे.

राकेश घानोडेनागपूर : सरकार व बचाव पक्षाचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष सत्र न्यायालयाचे न्या. एस. बी. गावंडे यांनी शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड खटल्यावरील निर्णय राखीव ठेवला आहे. निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.

गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. इतर आरोपींमध्ये गणेशची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी, भाऊ अंकित व एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. या न्यायालयात अल्पवयीन मुलगा वगळता इतर तीन आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३९४, ३६४, २०१, १२०-ब, ३४ व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलम ३ (२) (५) हे दोषारोप निश्चित करण्यात आले आहेत. उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे होती. सरकारच्या वतीने विशेष वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. त्यांनी आरोपींविरुद्धचे गुन्हे सिद्ध करण्यासाठी ३५ साक्षीदार तपासले. तसेच, वैद्यकीय अहवालासह इतर विविध ठोस पुराव्यांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. फिर्यादी रविकांत कांबळे यांचे वकील ॲड. समीर सोनवणे यांनी त्यांना सहकार्य केले. आरोपींच्या वतीने ॲड. आर. एम. भागवत व ॲड. अनिरुद्ध चांदेकर यांनी युक्तिवाद केला. 

फेब्रुवारी २०१८ मधील घटनाही घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली. त्या दिवशी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिशीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावाजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय