शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकारांनी एकाहून अधिक कौशल्य आत्मसात करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 13:06 IST

स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागाचा सुवर्ण महोत्सवी सोहळा साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बदलत्या काळात पत्रकारितेतील कार्यप्रणाली तसेच पत्रकारांवरील जबाबदाऱ्यादेखील बदलत आहे. स्पर्धेच्या या युगात पत्रकारांसमोर ‘डिजिटलायझेशन’ तसेच ‘एआय’चे (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स) आव्हान आहे. याला सामोरे जात असताना पत्रकारांनी एकापेक्षा जास्त कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.जनसंवाद विभागाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, विभागप्रमुख डॉ.मोईज हक प्रामुख्याने उपस्थित होते. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक यांच्या दैनिकांचे वितरण मर्यादित होते; आजसारखी त्यांची व्याप्ती नव्हती. तरीही त्यांचा प्रभाव आजच्या माध्यमांपेक्षा अधिक होत असे.लोकमान्य टिळकांना वर्तमात्रपत्रांतील लिखाणामुळे मंडालेच्या तुरुंगात पाठविण्यात आले. त्यांच्याविरोधात मुंबईच्या अशिक्षित गिरणी कामगारांनी मोठे आंदोलन केले होते. ते टिळकांच्या वृत्तपत्राचे वाचक नव्हते, पण त्यांना हे माहीत होते की, हा माणूस आपल्या भल्यासाठी लिहितो. पत्रकारांचे स्वातंत्र्य टिकून रहावे यासाठी अशिक्षित कामगारांनी जीवाचे बलिदान केले होते. मागील ३० वर्षांमध्ये माध्यमांना कॉर्पोरेट स्वरूप आले आहे. माध्यमे हा उद्योग असला तरी पत्रकारिता हा काही उद्योग नाही. तो नफ्यासाठी केला जात असेल, पण पत्रकारिता ही आदर्शांनुसार चालते, असे प्रतिपादन पी.साईनाथ यांनी केले.प्रसारमाध्यमांचे सामर्थ्य कायम असून काळानुरुप पत्रकारांना स्वत:ला बदलले पाहिजे. अभ्यासक्रमांमध्येदेखील बदल असतील तर विद्यापीठ त्यासाठी नेहमीच पुढाकार घेईल, असे डॉ.विनायक देशपांडे यांनी सांगितले.डॉ.मोईज हक यांनी संचालन करत असताना विभागाच्या वाटचालीवर तसेच विविध उपक्रमांवर प्रकाश टाकला. प्रा. स्निग्धा खटावकर यांनी संचालन केले तर अमर अणे यांनी आभार मानले.

पत्रकारितेची बदलती व्याप्ती समजून घ्या : पुप्पाला४‘जनसंवाद क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी’ या विषयावरील परिसंवादात स्वतंत्र पत्रकार व माध्यम सल्लागार चंद्रमोहन पुप्पाला, वरिष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर, ‘सार डिजिटल‘चे प्रमुख अनुराग कुळकर्णी, जी.व्ही.के. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कॉर्पोरेशनचे ‘कॉर्पोरेट कम्युनिकेशन’ व्यवस्थापक भालचंद्र चोरघडे, ‘आर.जे.’ मिलिंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पत्रकारितेची व्याप्ती बदलते आहे व त्याचा विस्तार होतो आहे. केवळ टीव्ही, वर्तमानपत्र यातूनच पत्रकारिता होते असे नाही. तर नवमाध्यमांतदेखील विविध ‘प्लॅटफॉर्म्स’ उपलब्ध आहेत. मूळ प्रवाहातील माध्यमांसह नवमाध्यमांना उत्कृष्ट मजकूर आवश्यक आहे. त्यामुळे स्वतंत्र पत्रकारिता करत या संस्थांना दर्जेदार मजकूर पुरविला जाऊ शकतो, अशी माहिती चंद्रमोहन पुप्पाला यांनी दिली. खासगी रेडियो क्षेत्रात नव्या टॅलेंटची आवश्यकता आहे. परंतु कौशल्य असलेले मनुष्यबळ मिळत नसल्याची खंत मिलिंद पाटील यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Journalistपत्रकार