शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
4
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
5
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
6
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
7
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
8
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
9
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
10
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
11
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
12
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
13
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
14
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
15
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
16
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
17
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
18
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर

जल चळवळीत सहभागी व्हा!

By admin | Updated: February 3, 2017 02:54 IST

आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे.

राजेंद्र सिंह : जागतिक ‘पाणथळ’ दिन नागपूर : आज राज्यातील पाणथळांचे जतन करण्याची गरज आहे तसेच नवीन पाणथळ निर्माण करून जमिनीची धूप थांबवून पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. मात्र या सर्व गोष्टी बोलून नाही तर निसर्गासाठी काहीतरी करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक व्यक्तीने जल चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रसिद्घ जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केले. वन विभाग, सामाजिक वनीकरण, डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा वनस्पतीशास्त्र विभाग, वनराई सामाजिक संस्था आणि आॅरेज सिटी वॉटर विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी जागतिक पाणथळ दिनानिमित्त ‘भविष्यात पाणथळाची उपयोगिता’ या विषयावर आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. हा कार्यक्रम दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत नागार्जुन सुरई ससाई होते. दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात डॉ. एस. व्ही. सी. कामेश्वरा राव, डॉ. सुनिता सिंग, डॉ. यशवंत काटपातल यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात देशभरातील विविध संस्थांचे प्रतिनिधी व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. सी. पवार यांनी केले. सायंकाळी पार पडलेल्या समारोप समारंभाला स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले,राजेंद्र सिंह, स्मारक समितीचे सदस्य व्ही.टी. चिकाटे, वनसंरक्षक डब्ल्यू. आय. अ‍ॅटबोन, किशोर मिश्रीकोटकर, व्ही.टी. चिकाटे व विलास गजघाटे उपस्थित होते.(प्रतिनिधी)