शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जयभीमने दुमदुमली दीक्षाभूमी

By admin | Updated: October 13, 2016 03:52 IST

हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते,

नागपूर : हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांचे थवे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते, ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी. सायंकाळी दीक्षाभूमी परिसराला निळ्या महासागराचे स्वरुप आले होते. विशाल, उचंबळणारा, गर्जणारा आंबेडकरी अनुयायांचा हा भीमसागर देशभरातून आला होता. जयबुद्ध, जयभीमच्या जयघोषाने अख्खा परिसर दुमदुमून गेला होता.६०व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो मैलावरून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांसाठी हजारावर संघटना सरसावल्या होत्या. पाण्यापासून ते भोजनदानाची चोख व्यवस्था करण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागासह, मेयो, मेडिकल व मनपाच्या आरोग्य विभागाने २४ तास आपली सेवा दिली. गेल्या तीन दिवसांपासून दीक्षाभूमी अनुयायांनी फुलून गेली होती. मात्र कुठेही गडबड, गोंधळ झालेला नाही. देशातीलच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या संख्येने अनुयायी आले होते. त्यांची शिस्तबध्दता खरोखरच वाखाणण्यासारखी होती. पुस्तकांची दालने ठरली वैशिष्ट्येया सोहळ्याच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर येणारा प्रत्येक जण आयुष्यभर पुरणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पुस्तकांची शिदोरी घेऊन जातो. विशेष म्हणजे, केवळ तीन दिवसांत सर्वात जास्त बुद्ध व आंबेडकरी साहित्य विकल्या जाते. यात सर्वात जास्त मागणी असते ती ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ ग्रंथाला. या पुस्तकांमधून बाबासाहेबांचे विचार वाचायला मिळतात. त्यांचे विचारच तर आम्हाला बळ देऊन जाते, असे कृतज्ञेचे भाव सर्वांच्याच चेहऱ्यावर असते. या वर्षी विविध पुस्तक प्रकाशन संस्थांनीही आपली दुकाने थाटली होती. परतताना कुणीउपाशी राहू नयेदीक्षाभूमीवरून बुधवारी आपआपल्या घरी परतताना कोणी उपाशीपोटी जाऊ नये म्हणून अनेक संस्थांनी भोजनदानाची व्यवस्था केली होती. मायावती सार्वजनिक उपासक उपासिका या संस्थेने १० हजार लोकांना जेवूघातले. लोखंडे कुटुंबांनीही विशेष व्यवस्था केली होती. माताकचेरी येथील माया मेश्राम यांनी दीक्षाभूमीच्या प्रवेशद्वाराजवळ बसून लोकांना भोजन वितरित केले.