शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

इतवारी सॅटेलाईट टर्मिनल

By admin | Updated: April 13, 2017 03:14 IST

इतवारी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे,

रेल्वे बोर्डाची मंजुरी : मोतीबाग वर्कशॉपला ८० कोटी नागपूर : इतवारी रेल्वेस्थानकाला सॅटेलाईट टर्मिनल करण्यासाठी काही दिवसांपूर्वी रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अमित कुमार अग्रवाल यांनी मोतीबाग नॅरोगेज संग्रहालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता इतवारीवरून नव्या रेल्वेगाड्या चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इतवारीत रेल्वेगाड्यांच्या देखभालीसाठी सुविधा विकसित करण्यात येत आहेत. येथे चौथा ब्रॉडगेज प्लॅटफार्म तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. इतवारी सॅटेलाईट टर्मिनल झाल्यास नागपूर रेल्वेस्थानकाचा ताण कमी होऊन रेल्वेचे संचालन सुरळीत होणार आहे. ‘डीआरएम’ अग्रवाल यांनी २०१८ पासून छिंदवाडा-इतवारी ब्रॉडगेजचे काम पूर्ण होऊन रेल्वेगाड्या चालविण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, सौरऊर्जेला चालना देण्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागात सहा स्थानकांवर रुफटॉप सोलर पॅनल लावले आहेत. लवकरच इतर स्थानकांवरही ते लावण्यात येतील. रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी दोन कोटी रुपये देण्यात आले आहेत. पहिल्यांदा नागपूर विभागातर्फे सर्वाधिक एक हजार कोटी रुपयांची कॅपिटन इन्व्हेस्टमेंट करण्यात येत आहे. दपूम रेल्वेचे ११०० किलोमीटरचे जगातील मोठा नॅरोगेज नेटवर्क आहे. याचे केंद्र नैनपूर असल्यामुळे तेथे ७.५ कोटी रुपयांचे रेल्वे संग्रहालय तयार करण्यात येत आहे. मोतीबाग वर्कशॉपच्या विकासासाठी ८० कोटी रुपये मिळाले आहेत. विभागातील जंगली भागात रेल्वेगाड्यांपासून जनावरांची सुरक्षा व्हावी यासाठी ३० मीटर रुंद १२ अंडरपास आणि ३ ओव्हरपास तयार करण्यात येत आहेत. ते म्हणाले, २०१६-१७ मध्ये भारतीय रेल्वेने चांगले प्रदर्शन केले. देशाच्या १६ झोनमध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने सर्वाधिक उत्पन्न मिळवले आहे. नागपूर विभागाने मालवाहतुकीद्वारे २४०.४७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले तर प्रवाशांपासून २२४.६० कोटी रुपये मिळविले. पत्रकार परिषदेला वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अर्जुन सिबल, अधिकारी उपस्थित होते. कळमना-नागपूर डबलिंग आॅगस्टपर्यंत कळमना-नागपूर डबलिंगचे काम आॅगस्ट २०१७ पर्यंत पूर्ण करण्याचा दावा ‘डीआरएम’ अग्रवाल यांनी केला. ते म्हणाले, या प्रकल्पात अतिक्रमणाची अडचण होती. परंतु ती दूर होत आहे. ५७ कुटुंबांना २५ हजार रुपये भरून इतरत्र घरे देण्यात येत आहेत. त्यांना स्थलांतरित करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. जूनपर्यंत अतिक्रमण हटवून आॅगस्टपर्यंत हे काम पूर्ण होईल.