शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शेतकरी दाम्पत्यावर फसाट ओढण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST

राम वाघमारे लाेकमत न्यूज नेटवर्क नांद : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. एकीकडे, ...

राम वाघमारे

लाेकमत न्यूज नेटवर्क

नांद : अस्मानी व सुल्तानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे. एकीकडे, सततच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना गाेधन पाळणे कठीण झाले आहे. दुसरीकडे सरकारच्या धाेरणांमुळे शेतात कष्टाची कामेे करायला मजूर मिळत नाही. अशा विपरित परिस्थतीत साेयाबीनची पेरणी केल्यानंतर, बियाणे व्यवस्थित झाकण्यासाठी शेतकऱ्याला भाड्याने बैलजाेडी मिळाली नाही. त्यामुळे त्याने झाडांच्या फांद्यांची फसाट ओढण्याचा निर्णय घेतला. ही फसाट ओढण्यासाठी मजूर न मिळाल्याने, नाईलाजास्तव शेतकरी दाम्पत्याने दिवसभर शेतात फासट ओढली. हा प्रकार नांद परिसरातील पांजरेपार (ता.भिवापूर) शिवारात साेमवारी अनुभवायला मिळाला.

मृग नक्षत्रात बऱ्यापैकी पाऊस बरसत असल्याने, नांद (ता.भिवापूर) परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे तुकाराम केशव राऊत (४५) व संगीता तुकाराम राऊत (३२), रा.महालगाव, ता.भिवापूर या शेतकरी दाम्पत्यानेही साेयाबीन पेरणीचा निर्णय घेतला. त्यांची पांजरेपार शिवारात चार एकर वडिलाेपार्जित शेती आहे. त्यांच्याकडे बैलजाेडी हाेती. मात्र, संपत्तीच्या वाटणीत ती बैलजाेडी माेठ्या भावाच्या वाट्याला गेली असल्याचे तुकाराम राऊत यांनी सांगितले.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आपण उमरेड शहरातील किराणा दुकानात नाेकरी केली. याच वर्षी वडिलाेपार्जित संपत्तीची वाटणी झाल्याने आपण शेतावर परतण्याचा, तसेच शेतात साेयाबीनचे पीक घेण्याचा निर्णय घेतला. पेरणीसाठी भाड्याने बैलजाेडी सांगितली. पेरणी करताच, साेयाबीनचे बियाणे व्यवस्थित झाकावे लागते. त्यामुळे फसाट ओढण्यासाठी दुसरी बैलजाेडी व मजूर मिळाले नाही. त्यामुळे आपण स्वत: फसाट ओढण्याचा निर्णय घेतला. फसाट जड असून, ती संपूर्ण शेतात एकट्याला ओढणे शक्य हाेत नाही, हे लक्षात येताच, पत्नी संगीता आपल्या मदतीला आली. आम्ही दाेघांनी दिवसभर ही फसाट ओढून शेतातील संपूर्ण बियाणे झाकल्याचेही तुकाराम राऊत यांनी सांगितले.

...

१,५०० रुपये भाडे

पेरणीसाठी बैलजाेडीला एका दिवसासाठी १,५०० रुपये भाडे द्यावे लागते. पेरणीसाठी लागणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा खर्च वेगळा असताे. एक बैलजाेडी दिवसभरात चार ते साडेचार एकर शेताची पेरणी करते. ग्रामीण भागात आधीच गाेधन कमी झाल्याने, तसेच सर्व शेतकऱ्यांची पेरणी एकाच वेळी येत असल्याने, पेरणीसाठी व फसाट ओढण्यासाठी बैलजाेडी मिळत नाही. आपण शेतकरी असून, शेतात कष्टाची कामे करण्यास आपल्याला कसलीही लाज वाटत नाही, अशी प्रतिक्रिया तुकाराम व संगीता राऊत यांनी व्यक्त केली.

...

बियाणे झाकणे महत्त्वाचे

पेरणी करताना शेतात छाेट्या चऱ्या तयार हाेतात. त्यात बियाणे पडल्यानंतर पाऊस आला आणि चऱ्यांमध्ये पावसाचे पाणी काही वेळ साचून राहिल्यास साेयाबीनचे बियाणे उगवत नाही. त्यामुळे ते काळजीपूर्वक झाकावे लागते. त्यासाठी झाडांच्या फांद्यांची फसाट तयार करून, ती संपूर्ण शेतात फिरवली जाते. फसाटमुळे चाऱ्यांच्या काठावरील माती आत जाऊन त्या सपाट हाेत असल्याने, पाणी साचण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शेतकरी फसाटद्वारे बियाणे झाकण्याला विशेष महत्त्व देतात.