शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

नवतपा तापतोय

By admin | Updated: May 26, 2017 02:41 IST

नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला.

नागपूर ४५.५ अंशावर : आकाशात ढगांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला. यात नागपुरातील तापमान ४५.५ अंशावर पोहोचले, तर चंद्रपूर ४७ अंशावर खाली आले. गुरुवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सूर्य आग ओकू लागला आहे. मागील आठवडाभरापासून ४५ अंशाच्या घरात असलेल्या विदर्भातील तापमानाने आता अचानक ४८ अंशाकडे वाटचाल सुरू केली आहे. या उन्हाच्या तीव्र लाटांमध्ये अक्षरश: विदर्भ होरपळून निघत आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने या नवतपाच्या काळात विदर्भातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचावासाठी प्रत्येकानेकाळजी घेण्याची गरज आहे. जाणकारांच्या मते, नवतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात अचानक वाढ होते. त्याचा परिणाम गुरुवारी पहिल्याच दिवशी दिसून आला. सकाळपासूनच अंगाला चटके बसत होते. यानंतर दुपारी सूर्य अक्षरश: आग ओकत होता. मात्र सायंकाळी ४.३० वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आकाशात ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा कोसळल्या. यामुळे वाढत्या तापमानाला थोडा ब्रेक लागला होता. त्याचवेळी हवामान खात्याने नवतपाच्या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी नवतपाच्या काळात उपराजधानीतील पारा हा ४७ अंशावर तर चंद्रपूर ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. बुधवारी चंद्रपूर येथील तापमानाने ४७.२ अंशावर सर्वोच्च उच्चांक गाठला होता. गुरुवारी मात्र ४७ अंशावर खाली आले आहे. मात्र त्याचचेळी नागपुरातील तापमानात ०.२ अंशाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नागपुरातील तापमान ४५.३ अंशावर होते.पावसाची शक्यता हवामान खात्याने नवतपामधील २५ आणि २६ मे रोजी सर्वाधिक तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी २७ व २८ मे रोजी सायंकाळी वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २९ आणि ३१ मे दरम्यान वादळी पाऊससुद्धा होऊ शकतो, असे सांगितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार यापूर्वी २ जून २००७ रोजी चंद्रपूर शहरातील तापमान तब्बल ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तो आजपर्यंतच्या तापमानातील सर्वोच्च उच्चांक मानला जातो. या वाढत्या तापमानाचा माणसासह पशु-पक्ष्यांना सुद्धा फटका बसत आहे. गुरुवारी नागपूर ४५.५, चंद्रपूर येथे ४७ अंश, अकोला ४५.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४२.६, ब्रम्हपुरी ४६.९, गोंदिया ४४.४, वाशिम ४२.०, वर्धा ४५.७ व यवतमाळ येथे ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.