शहरं
Join us  
Trending Stories
1
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
2
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
ऑलिम्पिक क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, कधीपासून रंगणार 'रन'संग्राम? जाणून घ्या
4
५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत! आयुष्मान कार्ड अंतर्गत नेमके कोणते आजार येतात? लगेच तपासा!
5
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
6
शुभांशू शुक्ला परतले, पंतप्रधान मोदींनी स्वागत केले; गगनयान मोहिमेचा उल्लेख करत म्हणाले...
7
Astro Tips: सगळं काही चांगलं आहे, तरी लग्न होत नाही; याला कारणीभूत ठरू शकते ग्रहदशा!
8
Olympics 2028: ऑलिंम्पिकचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठं रंगणार क्रिकेट सामने? A टू Z माहिती
9
फक्त २० रुपयांमध्ये २ लाखांचा विमा! मोदी सरकारची 'ही' योजना संकटात बनेल आधार! कसा करायचा अर्ज?
10
"तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते..."; विधानसभेत ठाकरेंचे आमदार आणि शिंदेसेनेचे मंत्री भिडले
11
"मराठी माणसानेच मराठी भाषेचं नुकसान केलं...", आपल्याच भाषेबद्दल हे काय बोलून गेला आस्ताद काळे? भडकले चाहते
12
"खाण्यासाठीच कमावतोय..."; मॅनेजरने लंच ब्रेक घेण्यापासून रोखलं, कर्मचाऱ्याने सडेतोड उत्तर दिलं
13
४ दिवसांच्या घसरणीनंतर बाजाराची जोरदार मुसंडी! हिरो मोटो ते सन फार्मा... 'या' शेअर्सने केलं मालामाल
14
Pune Porsche Accident Update: दोघांना उडवणाऱ्या आरोपीला दिलासा, पोलिसांना मोठा झटका; न्याय मंडळाचा निर्णय काय?
15
बेडरुमचा दरवाजा वाजवला, आईला संशय आला; दार तोडताच रक्ताच्या थारोळ्यात दिसले पती-पत्नी
16
विकली जाणार ५४ वर्ष जुनी 'ही' कंपनी, तुम्ही नक्कीच नाव ऐकलं असणार; ४५ देशांत आहे ६,४८२ कोटींचा व्यवसाय 
17
सरकार नेमके कोणाला, कशाला 'अर्बन नक्षलवाद' ठरवणार आहे?; जनसुरक्षा कायद्यावरून प्रकाश आंबेडकरांचा सवाल
18
'कुठल्या दलित व्यक्तीला का पाठवलं नाही?', शुभांशू शुक्ला यांच्या अंतराळ यात्रेवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका!
19
चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाखाली 'प्रोजेक्ट' धर्मांतर सुरू होते, काम करणाऱ्या मुलींना पैसे दिले जात होते
20
डाएटिंग, व्यायाम... सर्व करुन दमलात पण वजन कमीच होईना; रोजच्या 'या' ६ सवयी जबाबदार

नवतपा तापतोय

By admin | Updated: May 26, 2017 02:41 IST

नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला.

नागपूर ४५.५ अंशावर : आकाशात ढगांची गर्दी लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवतपाच्या पहिल्याच दिवशी सूर्य उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात चांगलाच तापला. यात नागपुरातील तापमान ४५.५ अंशावर पोहोचले, तर चंद्रपूर ४७ अंशावर खाली आले. गुरुवारपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यासोबतच सूर्य आग ओकू लागला आहे. मागील आठवडाभरापासून ४५ अंशाच्या घरात असलेल्या विदर्भातील तापमानाने आता अचानक ४८ अंशाकडे वाटचाल सुरू केली आहे. या उन्हाच्या तीव्र लाटांमध्ये अक्षरश: विदर्भ होरपळून निघत आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून जीवाची लाहीलाही होत आहे. हवामान खात्याने या नवतपाच्या काळात विदर्भातील तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचावासाठी प्रत्येकानेकाळजी घेण्याची गरज आहे. जाणकारांच्या मते, नवतपाच्या काळात सूर्याची किरणे थेट जमिनीवर पडतात. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात अचानक वाढ होते. त्याचा परिणाम गुरुवारी पहिल्याच दिवशी दिसून आला. सकाळपासूनच अंगाला चटके बसत होते. यानंतर दुपारी सूर्य अक्षरश: आग ओकत होता. मात्र सायंकाळी ४.३० वाजतानंतर अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. आकाशात ढगांची गर्दी होऊन काही ठिकाणी पावसाच्या सरीसुद्धा कोसळल्या. यामुळे वाढत्या तापमानाला थोडा ब्रेक लागला होता. त्याचवेळी हवामान खात्याने नवतपाच्या काळात वादळी वाऱ्यांसह पावसाचाही अंदाज वर्तविला आहे. यापूर्वी नवतपाच्या काळात उपराजधानीतील पारा हा ४७ अंशावर तर चंद्रपूर ४९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे. बुधवारी चंद्रपूर येथील तापमानाने ४७.२ अंशावर सर्वोच्च उच्चांक गाठला होता. गुरुवारी मात्र ४७ अंशावर खाली आले आहे. मात्र त्याचचेळी नागपुरातील तापमानात ०.२ अंशाने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बुधवारी नागपुरातील तापमान ४५.३ अंशावर होते.पावसाची शक्यता हवामान खात्याने नवतपामधील २५ आणि २६ मे रोजी सर्वाधिक तापमानाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र त्याचवेळी २७ व २८ मे रोजी सायंकाळी वादळाची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच २९ आणि ३१ मे दरम्यान वादळी पाऊससुद्धा होऊ शकतो, असे सांगितले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार यापूर्वी २ जून २००७ रोजी चंद्रपूर शहरातील तापमान तब्बल ४९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तो आजपर्यंतच्या तापमानातील सर्वोच्च उच्चांक मानला जातो. या वाढत्या तापमानाचा माणसासह पशु-पक्ष्यांना सुद्धा फटका बसत आहे. गुरुवारी नागपूर ४५.५, चंद्रपूर येथे ४७ अंश, अकोला ४५.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४२.६, ब्रम्हपुरी ४६.९, गोंदिया ४४.४, वाशिम ४२.०, वर्धा ४५.७ व यवतमाळ येथे ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.