शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

-तर आज मोठा अधिकारी असतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:45 IST

जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे.

ठळक मुद्दे चिंधूभाऊंची खंत : दिव्यांगत्वावर मात करीत ३० वर्षे शासकीय सेवा

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे. तब्बल ३० वर्षे शासकीय सेवा करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र निरोपाच्या क्षणी त्यांनी खंत व्यक्त करीत सर्वांना बुचकळ्यात पाडले. ‘ग्रामसेवक म्हणून रुजू झालो असताना ३० वर्षाच्या सेवाकाळात पदोन्नतीचा लाभ मिळवत मोठा अधिकारी झालो असतो. मात्र कुटील धोरणामुळे मला चपराशाची कामे करावी लागली’ ही त्यांची खंत होती.स्वेच्छानिवृत्तीनिमित्त त्यांचा काटोल पंचायत समितीतर्फे छोटेखानी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त करताना ही खंत व्यक्त केली. सोबतच अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, खंडविकास अधिकारी साने, विस्तार अधिकारी मधुकर पारधी, पी. एस. शेंडे, कृषी अधिकारी गोरटे, तालुका पशुविकास अधिकारी अनिल ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारडसिंगा रहिवासी चिंधू सुरजुसे यांनी सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानिमित्त त्यांना समारंभाद्वारे निरोप देण्यात आला. सोबतच काटोलपासून पारडसिंगापर्यंत वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. या सत्कारामुळे भारावून गेलेल्या चिंधूभाऊंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत अनेक आठवणींना उजाळा दिला.चिंधूभाऊ म्हणाले, ठेंगणा म्हणून जन्माला आल्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वर्गमित्रांसह शाळेतील विद्यार्थी मला चिडवित. काही मला सायकलवर बसवून, कडेवर घेऊनही फिरवायचे. आई-वडिलांपुढे शिक्षणाचा हट्ट धरला आणि तो त्यांनी पूर्ण केल्याने शेतकी शाळेत कृषी पदविकापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर १९८६ मध्ये ग्रामसेवक म्हणून नागपूर जिल्हा परिषदेत रुजू झालो. परंतु तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकाºयांच्या धोरणामुळे मला ग्रामसेवकपदावर कार्य करण्यापासून रोखले आणि चपराशापासून हमालीपर्यंतची कामे करावी लागली. या काळात अनेक चांगले-वाईट प्रसंग वाट्याला आले. कुणी मदत केली, कुणी दूर पळाले. शासकीय सेवेत ३० वर्षे देत पूर्णपणे जीव लावून काम केले’ असेही त्यांनी सांगितले.आगळीवेगळी ‘आॅफर’ठेंगणा, कमी उंचीचा असल्याने सर्कशीत जाण्याचा अनेकांनी सल्ला दिला. एवढेच काय तर सर्कसवाले घरापर्यंत आले होते, अशी आठवणही चिंधूभाऊंनी स्वेच्छानिवृत्तीनिमित्त सत्काराला उत्तर देताना काढली. सर्कसवाले घरापर्यंत आले, मात्र माझ्या आई-वडिलांनी त्यांना परत पाठविले. तसे केले नसते तर कदाचित मी सर्कशीतही राहिलो असतो, असा प्रसंग सांगत ते भावूक झाले. ३० वर्षांच्या शासकीय सेवाकाळात नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत त्यांनी विविध विभागात आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली. जिथे गेले तेथे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाºयांसोबत स्वत:चे नातेसंबंध दृढ केले. त्यामुळे त्यांना सर्वत्र ओळखले जाते. काटोल पंचायत समितीतही त्यांनी सर्वांना आपलेसे केले. सहा महिन्यांपूर्वीच चिंधूभाऊंच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे ते काही दिवसांपासून थोडे अस्वस्थ दिसत होते. अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहीर केला.