शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीबीपी’ करणार गडचिरोलीतील नक्षलवाद्यांशी मुकाबला

By admin | Updated: November 14, 2014 00:49 IST

एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला

संजय कौशिक : ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बंदोबस्तनागपूर : एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ)छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात येणार आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांसाठी आता इंडो तिबेट बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले असून तेच नक्षलवाद्यांशी मुकाबला करतील, अशी माहिती ‘सीआरपीएफ’च्या पश्चिम सेक्टरचे महानिरीक्षक संजय कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘सीआरपीएफ’ला ७५ वर्षे पूर्र्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय कौशिक म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्याची जबाबदारी इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली भागातील ‘सीआरपीएफ’च्या जवानांना तेथून हटविणे सुरू झाले आहे. ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मार्चपर्यंत गडचिरोलीतील सर्वच ‘सीआरपीएफ’च्या कंपन्या हलविण्यात येणार आहेत. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी ‘सीआरपीएफ’ नेहमीच राज्यातील पोलिसांशी समन्वय साधून आपल्या कारवाया करते. सध्या ‘सीआरपीएफ’कडे गांधीनगर, नागपूर, दिल्लीत तीन महिला बटालियन असून आणखी एक महिला बटालियन सुरूकरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘सीआरपीएफ’मध्ये कोब्रा कंपनीच्या १० सुसज्ज कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून देशात उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांचा सामना करण्यात येतो. सध्या ‘सीआरपीएफ’ला हवे तेवढ्या बुलेट प्रूफ जॅकेटचा पुरवठा झाला नसून आगामी काळात लवकरच हे जॅकेट सर्वांना पुरविण्यात येतील. देशाच्या सुरक्षेसाठी मागील ७५ वर्षे ‘सीआरपीएफ’ने अविरत कार्य केले आहे. हे खूप जोखमीचे काम आहे. ब्रिटिशांच्या काळात क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या नावाने स्थापन झालेली फोर्स ब्रिटिशांना मदत करायची. पूर्वी फोर्सचे कार्यालय मध्यप्रदेशातील निमज येथे होते. त्यानंतर १९४९ मध्ये सरदार पटेल यांनी ‘सीआरपीएफ’ अ‍ॅक्ट तयार करून फोर्सला ध्वज प्रदान केला. देशात कुठेही पेचप्रसंग उद्भवल्यास ‘सीआरपीएफ’ची मागणी होते. यावेळी महानिरीक्षक संजय कौशिक यांच्या हस्ते बास्केटबॉल स्पर्धेतील विजेती चमू केंद्रीय रिझर्व्ह पोलीस विद्यालय नागपूर आणि उपविजेत्या सेंट झेविअर्सच्या चमूला पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संजय लाठकर, अखिलेश प्रसाद सिंह यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विनिता ढेकले यांनी केले. (प्रतिनिधी)२००० ‘सीआरपीएफ’ जवान शहीददेशात कुठेही तणावाचे वातावरण पसरल्यास केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात येते. अतिशय कठीण परिस्थितीत जवानांना मुकाबला करायचा असतो. अशा परिस्थितीत देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना ‘सीआरपीएफ’चे २००० जवान शहीद झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय कौशिक यांनी देऊन त्यांना अभिवादन केले. याशिवाय अनेक जवानांना कर्तव्य बजावताना कायमचे अपंगत्व आले. काहींचे हात, काहींचे पाय, डोळे निकामी होऊन त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.