शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

लोणार सरोवराकडे केवळ महसुलाच्या दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:08 IST

नागपूर : रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे केवळ पर्यटन व ...

नागपूर : रामसर पाणथळ स्थळाचा दर्जा मिळालेल्या आणि व्यापक वैज्ञानिक संशोधनाला वाव असलेल्या जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे केवळ पर्यटन व महसूल मिळविण्याच्या दृष्टिकोनातून पाहणे अत्यंत चुकीचे आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नोंदविले. तसेच, लोणार सरोवर विकास व संवर्धनासंदर्भात एकला चलो रे भूमिका स्वीकारल्यामुळे राज्य सरकारवर ताशेरे ओढले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात उच्च न्यायालयात गेल्या १२ वर्षांपासून जनहित याचिका प्रलंबित आहे. दरम्यान, न्यायालयाने लोणार सरोवराच्या विकास व संवर्धनाकरिता वेळोवेळी आवश्यक आदेश दिले. परंतु, गेल्या ५ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोणार सरोवराला भेट देऊन काही सूचना केल्यानंतर प्रशासन परस्पर कामाला लागले. या प्रक्रियेत न्यायालयाला विश्वासात घेण्यात आले नाही, असे खडेबोल न्यायालयाने सुनावले.

गेल्या ८ तारखेला न्यायालयाने याविषयी नाराजी व्यक्त करून राज्य सरकारच्या पुढील भूमिकेची माहिती मागितल्यानंतर केवळ १६ दिवसात लोणार सरोवर विकास आराखडा अंमलबजावणी समिती आणि लोणार सरोवर विकास आराखडा संनियंत्रण समिती स्थापन करून जीआर जारी केला गेला. लोणार सरोवराच्या विकास व संवर्धनाविषयी सरकार उशिरा का होईना जागे झाले, हे चांगले लक्षण आहे. परंतु, सरकार नेमकी कोणती कामे करणार आहे, त्यासाठी किती निधी दिला जाणार आहे, संवर्धनाची काळजी कशी घेतली जाणार आहे, संशोधनाकरिता काय योजना आहे, याची काहीच माहिती न्यायालयाला देण्यात आली नाही. तसेच, संबंधित जीआर पर्यटन व सांस्कृतिक विभागाने जारी केला आहे. या विभागाचे लोणार सरोवर संवर्धन व विकासाशी काहीच देणे-घेणे नाही. त्यावरून सरकार लोणार सरोवराकडे केवळ पर्यटनस्थळ म्हणून पाहत असल्याचे दिसून येते. त्यानुसार येथे केवळ आधुनिक सुविधा निर्माण केल्या गेल्यास या जागतिक महत्त्वाच्या ठिकाणाची केवळ पिळवणूक होईल, अशी भूमिका न्यायालयाने मांडली.

-----------------------

सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचा आदेश

उच्च न्यायालयाने सदर भूमिका मांडल्यानंतर राज्य सरकारला लोणार सरोवराचा विकास, संवर्धन, पर्यटन, संशोधन इत्यादी बाबींचा एकत्रित विचार करण्याचा व त्यानुसार संबंधित कामांचा सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करण्याचा आदेश दिला. याकरिता सरकारला १५ मार्चपर्यंत वेळ देण्यात आला. यासंदर्भात अ‍ॅड. कीर्ती निपाणकर (नागपूर), गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने (दोन्ही बुलडाणा) यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. ॲड. आनंद परचुरे यांनी न्यायालय मित्र म्हणून, ॲड. एस. एस. सन्याल यांनी मध्यस्थातर्फे तर, ॲड. केतकी जोशी यांनी सरकारतर्फे कामकाज पाहिले.