शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

उद्योग क्षेत्र पूर्वपदावर येण्यास लागणार वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST

नागपूर : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायावर वेळेचे बंधन ...

नागपूर : कोरोना महामारीने गेल्या दीड वर्षांपासून उद्योजक आणि व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसायावर वेळेचे बंधन असल्याने उत्पादनांची मागणी आणि पुरवठ्यात अंतर कायम आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर उद्योग सांभाळले, पण वेगवान होण्यास आणखी काही वेळ लागणार असल्याचे उद्योजकांचे मत आहे.

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश राठी म्हणाले, दुसऱ्या लाटेनंतर सध्या बहुतांश उद्योगात पूर्ण क्षमतेने उत्पादन होऊ लागले आहे. नवीन ऑर्डरसुद्धा मिळत आहेत, पण निर्बंधामुळे विविध क्षेत्रात व्यावसायिक घडामोडी प्रभावित झाल्याने मागणी आणि पुरवठ्याचे गणित बिघडले आहे. दुसरीकडे फायनान्सच्या अडचणी येत आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने भीतीचे वातावरण पसरल्याचा परिणाम औद्योगिक प्रगतीवर होत आहे. अशा स्थितीत भीती कमी झाल्यानंतर उद्योगाला वेग येण्यासाठी डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता आहे.

बुटीबोरी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल म्हणाले, सध्या उद्योग नुकसानीतून बाहेर येत आहेत. बुटीबोरीत ३५० पैकी ३०० उद्योगात उत्पादन होऊ लागले आहे. कर्मचारी पूर्ण क्षमतेने परतले आहे. या ठिकाणी पूर्ण क्षमतेने उत्पादन होत आहे. नवीन ऑर्डर मिळत आहेत. पण उद्योगांना फायनान्सच्या अडचणी येत आहेत. स्थिती सामान्य होण्यास आणखी वेळ लागणार आहे.