शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

अजनीवन वाचवणार, ‘आयएमएस’चा आराखडाही बदलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:44 IST

प्रभाव लोकमतचा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अजनी येथे होणाऱ्या ‘आयएमएस’ला (इंटरमॉडेल स्टेशन) वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोध सुरू झाला ...

प्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अजनी येथे होणाऱ्या ‘आयएमएस’ला (इंटरमॉडेल स्टेशन) वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून प्रचंड विरोध सुरू झाला आहे. ही बाब लक्षात घेता आता ‘आयएमएस’च्या आराखड्यातच बदल करण्याचे ठरविण्यात आले आहे. नवीन आराखडा तयार करण्यात येणार असून यात जास्तीत जास्त झाडे कशी वाचतील यावर भर राहणार आहे. याशिवाय प्रकल्पासाठी जी झाडे हटविणे आवश्यक असेल, त्यांचे प्रकल्पातीलच मोकळ्या जागेत प्रत्यारोपण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. अजनी वनातील झाडांची नियोजित कत्तल व त्यामुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने प्रकाश टाकला हे विशेष.

अजनी वनासाठी होणारा विरोध लक्षात घेत आयएमएस प्रकल्पाला गती देण्यासाठी ३१ जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते. ‘आयएमएस’ प्रकल्पासाठी रेल्वे २०० एकर जागा देणार आहे. या प्रकल्पासाठी सिंचन, मेडिकल विभाग, मध्यवर्ती कारागृह, ‘एफसीआय’ यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. याशिवाय जी झाडे हटविणे अनिवार्य असेल त्यांचे प्रत्यारोपण एकतर प्रकल्पातील मोकळी जागा किंवा रिंगरोडवर करण्यात येईल. पुढील दोन महिन्यांत नवीन आराखडा तयार होईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

‘नीरी’तील जागा घेणार नाही

या प्रकल्पासाठी ‘नीरी’ची जवळपास दोन एकर जागा मागण्याचा ‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांचा मानस होता. मात्र गडकरी यांनी त्याला विरोध केला आहे. ही जागा अधिग्रहित करण्याची आवश्यकता नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

रेल्वे कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा देणार

या प्रकल्पासाठी रेल्वेकडून २०० एकरची जागा देण्यात येणार आहे. यात रेल्वे कर्मचारी राहत असलेले ‘क्वार्टर’देखील तुटणार आहेत. मात्र रेल्वे कॉलनीचे पुनर्वसन करण्यात येईल. या संदर्भात लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे. त्यावर अगोदर नवीन ‘क्वार्टर्स’ बनतील. कर्मचाऱ्यांना तिप्पट सुविधा मिळतील अशा प्रकारचे पुनर्वसन असेल, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. अजनी येथील ब्रिटीशकालीन पूलदेखील तोडण्यात येईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

‘मिहान’मध्ये ‘कार्गो हब’ नको

एकेकाळी गाजावाजा करण्यात आलेल्या ‘मिहान’ येथील ‘कार्गो हब’बाबत गडकरी यांनी मोठे वक्तव्य केले. शहराची सीमा वाढत असल्याने आता त्याला जास्त प्रोत्साहन देण्याची आवश्यकता नाही. विमानापुरते ते ठीक आहे. सिंदी रेल्वे येथे ‘लॉजिस्टिक हब’ उभारण्यात येत आहे. त्यावर भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यानंतर ‘इलेक्ट्रिक कार’नेच प्रवास

नागपुरात आल्यानंतर मी ‘बुलेटप्रुफ’ कारने प्रवास करतो. मात्र प्रदूषण कमी व्हावे यासाठी यापुढे ‘इलेक्ट्रीक कार’नेच प्रवास करीन. इतर लोकप्रतिनिधींनीदेखील ‘इलेक्ट्रिक’ वाहने वापरावीत, असे आवाहन गडकरी यांनी केले. दिल्ली-मुंबई येथील महामार्गाचा प्रकल्प अर्धा झाला; मात्र महापालिकेला महालातील केळीबाग मार्गावरील रस्ता बनविणे अद्यापही जमलेले नाही. मात्र मी पुढे महालातच राहायला जाईल, असे म्हणत गडकरी यांनी मनपाच्या पदाधिकाऱ्यांना चिमटा काढला.

‘आयएमएस’च्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

- ‘आयएमएस’मध्ये स्वस्त दरात भोजन देणारे ‘फूड मॉल्स’ उभारणार

- एस टी, शहरबस, खाजगी बससाठी ‘आयएमएस’ मध्यवर्ती केंद्र राहणार

- प्रकल्पात वापरण्यात येणाऱा ‘जेसीबी’ डिझेलऐवजी ‘सीएनजी’वर चालणार

-‘आयएमएस’पासून शहराबाहेर जाण्यासाठी कमीत कमी सिग्नल लागतील अशी व्यवस्था उभारणार

-‘आयएमएस’मधील सुधारणांसाठी जनतेकडून सूचना मागविणार

-पहिल्या टप्प्यासाठी बाराशे कोटींच्या निधीची मंजुरी

- प्रकल्पामुळे शहरातील १० हजार तरुणांना रोजगार मिळणार.