शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिवंतपणीच तो झाला देव!

By admin | Updated: May 14, 2014 00:11 IST

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.

राजुरा अपघाताला कलाटणी : याची डोळा मरण पाहिले

विठ्ठल कांबळे - घाटंजी

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.आणि दुसर्‍यादिवशी निरोप येतो,‘ बंडू जिवंत आहे.!’ तो जिवंतपणीच देव झाला. बंडूला गावी आणण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्याला जिवंत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जिवंतपणी मृत्यू अनुभवण्याचा प्रसंग यवतमाळ जिल्ह्यातील करमना येथील बंडू मांडवकर या तरुणावर आला.‘बंडू जिवंत आहे’ पुन्हा गाडी करून नातेवाईक राजुरा येथे गेले. बंडूला पाहून आनंदित झाले. त्याला गावी घेवून आले. तो खापरी येथे नातेवाईकाकडे आला आणि लोकांनी त्यास पाहण्यास एकच गर्दी केली. इकडे नातेवाईक व कुटुंबाच्या मनात धस्स झाले.

घाटंजी तालुक्यातील करमना येथे गुलाब मांडवकर आपल्या परिवारासह राहतात. त्यांना चार मुलं. तिसर्‍या नंबरचा बंडू नावाचा मुलगा. त्याला दोन अपत्य आहेत. तो आठ वर्षांपूर्वी गावातून निघून गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराजवळील रामपूर येथे तो वास्तव्यास होता. आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांचे भविष्य पाहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता.

५ मे रोजी त्याच्या मुलीचे गावात लग्न झाले. अन् ६ मे रोजी सकाळी करमना येथे त्याच्या घरी बंडूचे अपघातात निधन झाल्याचा दूरध्वनी आला. तेव्हा त्याचे वडील, भाऊ, पत्नी व नातेवाईक राजुरा येथे पोहोचले. प्रेत दाखविण्यात आले. चेहरा ओळखू येत नव्हता पण चेहर्‍याची ठेवण व शरीरयष्टी यावरून हा आपलाच बंडू आहे, अशी ओळख पटविली. ४ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. प्रेत ताब्यात घेतले. बर्फाची लादी घेवून प्रेत गावी आणले. आंघोळ घालता येत नसल्याने पायावरच पाणी टाकण्यात आले. गावकरी नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रीतिरिवाजाप्रमाणे तिसर्‍या दिवसाचा विधी केली आणि चौथ्या दिवशी देवकारण केले. बंडूच्या नावे चांदीचा देव करण्यात आला. तो देव्हार्‍यात ठेवण्यात आला. गरिबीत गरिबी सुमारे २५ हजार रुपये या सर्व विधीवर खर्च करण्यात आला. बंडू तर गेला. त्याच्या आठवणीत त्याचे कुटुंब अश्रू ढाळीत होते आणि अचानक सोमवार १२ दि. मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास राजुर्‍यावरून पुन्हा एकदा दूरध्वनी आला