शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

कठीण परिस्थितीतच होते आत्मशक्तीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सद्य:स्थितीत देश व शिक्षणक्षेत्रासमोर अनेक आव्हाने आहेत. आव्हानांना न घाबरता त्यांचा सामना केला पाहिजे. कठीण परिस्थितीतच आत्मबलाची परीक्षा होते व अशा स्थितीत केलेले प्रयत्न यशाच्या मार्गावर नेतात, असे मत इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे सदस्य सचिव प्रा.सच्चिदानंद जोशी यांनी व्यक्त केले. भारतीय शिक्षण मंडळाच्या ५२ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर हेदेखील उपस्थित होते. वर्तमान स्थितीतील आव्हानेदेखील आपल्याला अनेक नवीन गोष्टी शिकवत आहेत. रचनात्मकता, संयम, करुणा, सहयोग व साहस यांच्या माध्यमातून अशक्य बाबदेखील शक्य होऊ शकते हा विश्वासही स्थिती देत आहे. एकदुसऱ्यांना सहकार्य करतच देशाला प्रगतिपथावर न्यायचे आहे, असे प्रतिपादन प्रा.जोशी यांनी केले. आत्मीय संबंध ही आदर्श समाजाची ओळख आहे. यातूनच भारतीय संस्कृती दिसून येते. संपर्क व संवादातून आत्मीय संबंधांचा पाया रचला जातो व कठीण परिस्थितीत हीच बाब संजीवनीचे कार्य करते. आज संवादाची साधने वाढली आहेत. मात्र, संवाद कमकुवत झाला आहे. कुठल्याही संस्थेसाठी सशक्त संवाद अत्यावश्यक असतो. यातूनच राष्ट्रनिर्माणात एकतेचे महत्त्व कळते, असे मुकुल कानिटकर म्हणाले. यावेळी त्यांनी नवीन भारतीय शिक्षण धोरणासंदर्भात भारतीय शिक्षण मंडळाने केलेल्या कार्यांवर प्रकाश टाकला. महामंत्री उमाशंकर पचौरी यांनी सूत्रसंचालन केले.