लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : शहरातील माैदा मार्गावरील किट्स काॅलेज नजीकचा वळणमार्ग सध्या धाेकादायक ठरत असून, हा वळणमार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या मार्गावर रामटेक ते माैदा वाहतूक सतत सुरू असते. शिवाय रामटेक बसस्थानकाहून हा रस्ता पुढे नगरधन व हिवरा गावाला जाेडताे. त्यामुळे या मार्गावर वर्दळीचे प्रमाणसुद्धा अधिकच आहे. किट्स काॅलेज अथवा शीतलवाडी वळण घेताना वाहनचालकांना समाेरील वाहन नजरेस पडत नाही. दुसरीकडे या मार्गालगत पानटपरी व इतर अतिक्रमण अधिक असल्याने या ठिकाणी वाहतुकीला माेठा अडसर ठरत आहे.
टी-पाॅईंट असलेल्या या वळण मार्गावर किट्स काॅलेजचे सुमारे अडीच हजार विद्यार्थी, ३०० कर्मचारी तसेच मजूर व नागरिक ये-जा करतात. काही दिवसापूर्वीच किट्समधील कर्मचारी माणिक आग्रे यांना दुचाकीने धडक देत गंभीर जखमी केले. यापूर्वीसुद्धा येथे अनेकदा अपघात घडले आहेत. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययाेजना कराव्यात, या मागणीसाठी किट्सचे प्राचार्य अविनाश श्रीखंडे यांनी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुनील दमाहे यांच्याकडे निवेदन दिले. तसेच या वळणावर जुने झाडे तसेच रस्त्यालगत वाढलेल्या अतिक्रमणामुळे एकप्रकारे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे हे धाेकादायक वळण अपघातमुक्त व्हावे, अशी मागणी विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांकडून केली जात आहे.