शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कमकुवत विरोधी पक्षामुळेच शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST

नागपूर : देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असता तर आम्हाला शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची गरज पडली नसती. हे आंदोलन कमकुवत असलेल्या ...

नागपूर : देशामध्ये विरोधी पक्ष मजबूत असता तर आम्हाला शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची गरज पडली नसती. हे आंदोलन कमकुवत असलेल्या विरोधी पक्षामुळेच उभे राहिले. आम्ही बाहेर लढत आहोतच. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने सभागृहात आमची बाजू मांडावी. तरच ते शेतकऱ्यांसोबत आहेत असे समजावे लागेल, असे प्रतिपादन संयुक्त किसान मोर्चाच्या कोअर कमिटीचे सदस्य राकेश टिकैत यांनी केले.

संयुक्त किसान मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राकेश टिकैत नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, ते म्हणाले, आमचे आंदोलन कुण्याही पक्षाविरोधात नाही तर केंद्र सरकारने केलेले तीन बिल परत द्यावे, या एकमेव मागणीसाठी आहे. सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो. मात्र न्यायालयाने नेमलेल्या समितीतील सर्व सदस्य कायदे समर्थक आहेत. त्यामुळे आम्ही या समितीशी चर्चा वा वाटाघाटी करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. पत्रकार परिषदेला संयुक्त किसान मोर्चाचे राज्य समन्वयक संदीप गिड्डे, राष्ट्रीय किसान महासंघाचे संयोजक श्रीकांत तराळ, शेतकरी नेते अरुण वनकर, जय जवान, जय किसान संघटनेचे प्रशांत पवार आदी उपस्थित होते.

...

राजभवनाला ट्रॅक्टरचा घेराव घालणार

१८ जानेवारीला महिला किसान सन्मान दिवस आहे. त्याची तयारी सुरू असल्याची माहिती देऊन ते म्हणाले, २३ जानेवारीला एक हजार ट्रॅक्टरसह राजभवनला घेराव घालण्याचे नियोजन आहे. गनिमी कावा पद्धतीने होणारे हे आंदोलन कुठल्या राजभवनावर होईल, हे वेळेवर ठरवले जाईल, असे त्यांनी सांगितले. २६ जानेवारीला सुद्धा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल. मात्र ते कशा स्वरूपाचे असेल, हे त्यांनी जाहीर केले नाही.

...

तर त्यांनी बाहेर पडावे

‘किसान बिल वापसी नाही, तोपर्यंत किसान वापसी नाही’, अशी भूमिका स्पष्ट करून टिकैत म्हणाले, आमच्या आंदोलनात सुमारे ५५० संघटना आहेत. यापैकी एकही संघटना माघार घेणार नाही. मे २०२४ पर्यत आंदोलन सुरू ठेवण्याची आमची तयारी आहे. इतका दीर्घकाळ धीर धरण्याची तयारी नसणाऱ्यांनी आंदोलनातून बाहेर पडले तरी चालेल. आमचे आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही तर सरकार विरोधात आहे.

...

संयुक्त किसान माेर्चाचे समन्वयक चौधरी राकेश टिकैत यांची टीका

लुटारूंचे शेवटचे बादशहा कोण आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. हे बादशहा शेतकऱ्यांना लुटण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न करीत आहेत. पण, आम्ही या बादशहाचे प्रयत्न हाणून पाडू, अशी टिका टिकैत यांनी मोदींचे नाव न घेता केली.

कृषी कायदे रद्द होईपर्यत घरी परतायचे नाही हा आंदोलकांचा वज्रनिर्धार आहे. किमान हमी भावाचा कायदा झालाच पाहिजे, ही आमची मागणी आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यत आम्ही तसूभरही हलणार नाही, असे टिकैत यांनी स्पष्ट केले.