शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पाेर्टलमध्ये नाव समाविष्ट करणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : महादुला (ता. रामटेक) येथील आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर महादुला येथील २५ शेतकऱ्यांकडील धानाची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : महादुला (ता. रामटेक) येथील आदिवासी विकास महामंडळाच्या खरेदी केंद्रावर महादुला येथील २५ शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करण्यात आली. मात्र, त्यांची नावे राज्य शासनाच्या पाेर्टलमध्ये समाविष्ट न केल्याने त्यांना धानाचे चुकारे मिळाले नाही. शासनाने बंद केलेले हे पाेर्टल तात्पुरते सुरू करून त्यात या शेतकऱ्यांची नावे व इतर माहिती नमूद करून चुकारे देणे शक्य आहे. यासाठी शासनाला पत्र पाठविले आहे, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राठाेड यांनी दिली.

विशेष म्हणजे, या २५ शेतकऱ्यांनी धानाच्या विक्रीसाठी नाेंदणी करण्याच्या उद्देशाने त्यांचे सातबारा महादुला केंद्रावरील आदिवासी विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिले हाेते. कर्मचाऱ्यांच्या सूचनेवरून त्यांनी या केंद्रावर जानेवारीमध्ये धान आणले. त्याचे माेजमाप करून या शेतकऱ्यांना रीतसर पावती देण्यात आली. मात्र, पाेर्टलमध्ये नाव समाविष्ट नसल्याने चुकारे मिळणार नसल्याने या शेतकऱ्यांना सांगण्यात आले. त्यामुळे यासंदर्भात लाेकमतमध्ये शुक्रवारी (दि. १८) ‘त्या शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळणार कधी?’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले. आदिवासी विकास महामंडळाने या वृत्ताची सकारात्मक दखल घेतली आहे, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक राठाेड यांनी दिली.

आदिवासी विकास महामंडळाने महादुला येथील केंद्रावर या २५ शेतकऱ्यांकडून त्यांचे सातबारा स्वीकारत जानेवारीमध्ये ७६६ क्विंटल धानाचे माेजमाप केले. या शेतकऱ्यांना चुकाऱ्यापाेटी आदिवासी विकास महामंडळाकडून १४ लाख ३० हजार ८८८ रुपये घेणे आहे. नाेंदणी पाेर्टल ३१ मार्च राेजी बंद करण्यात आले. यात कर्मचाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या धानाच्या माेजमापाचे आकडे पाेर्टलवर नमूद केले नसावे किंवा अन्य तांत्रिक चुका केल्या असाव्यात, त्यामुळे ही समस्या निर्माण झाली, अशी माहिती प्रहार संघटनेचे रमेश कारामाेरे यांनी दिली.

दुसरीकडे, शासनाने अशाच प्रकारची गाेंदिया जिल्ह्यातील समस्या साेडविली आहे. त्यामुळे रामटेक तालुक्यातील समस्या साेडविणे कठीण नाही. सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पैशाची नितांत आवश्यकता आहे. पीककर्ज मंजुरी प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे शासनाने गाेंदिया जिल्ह्याप्रमाणे पाेर्टल तात्पुरते सुरू करावे व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रहार संघटनेचे रमेश कारामाेरे यांनी केली आहे....

सालेकसा तालुक्यातील समस्या साेडविली

सालेकसा (जिल्हा गाेंदिया) तालुक्यात ७३५ शेतकऱ्यांच्या चुकाऱ्याची समस्या निर्माण झाली हाेती. यात ३५० शेतकऱ्यांच्या धानाच्या माेजमापाचे आकडे पाेर्टलवर नमूद केले नव्हते तर ३८५ शेतकऱ्यांच्या बाबतीत शेतकरी व कर्मचाऱ्यांनी चुका केल्या हाेत्या. ही बाब लक्षात येताच शासनाच्या परवानगीने पाेर्टल तात्पुरते सुरू करण्यात आले. त्यात संपूर्ण माहिती नमूद करून सर्व शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले. याच पद्धतीने महादुला येथील शेतकऱ्यांना न्याय देता येऊ शकताे.

...

पाेर्टलवर सातबाराची नाेंद नाही

या प्रकरणात २५ शेतकऱ्यांच्या सातबाराची पाेर्टलवर नाेंदणी करण्यात आली नाही. ही विविध कार्यकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांची चूक आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर ती सुधारण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने राज्य शासनाशी पाेर्टल तात्पुरते सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. शासनाने परवानगी दिल्यास पाेर्टल सुरू करून शेतकऱ्यांच्या सातबारा व धानाच्या माेजमापाची नाेंदणी करून त्यांना चुकारे दिले जातील. सध्या रबी धानाची खरेदी सुरू झाली आहे. शासनाने आदेश दिल्यास याच खरेदीत या २५ शेतकऱ्यांचा समावेश करून त्यांना चुकारे देण्याची व्यवस्था करता येऊ शकते, अशी माहिती आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक राठाेड यांनी दिली.