शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

- तर विदर्भ वेगळा होणे आवश्यक

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख यांचे मत : लोकांचे बहुमत असावेनागपूर : विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मुंबईत मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला. त्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. त्यावर ना. देशमुख यांनी मत व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाची मागणी ही बरीच जुनी आहे. परंतु, याआधी या मागणीला जनतेचा पाठिंबा नव्हता. ही मागणी लोकांनी केलेली नव्हती. आता मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील जनता पुढे आली आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल राजकीय पक्षांनी घेणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातील विद्यार्थ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती झालेली आहे. त्या जनजागृतीमुळेच मोठ्या संख्येने या आंदोलनात विदर्भातील जनता सहभागी होत आहे. रस्त्यावर उतरत आहे.वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भात सध्या ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, मोर्चे निघत आहे. वेगळे विदर्भ राज्य व्हावे अशी विदर्भाचे बहुमत असेल आणि त्या मागणीसाठी वैदर्भीय जनता एकजुटीने उभी राहिल्यास जनतेच्या मागणीचा मान ठेवून वेगळा विदर्भ देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ना. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली. (प्रतिनिधी)नागपुरात तीन जागांसाठी राष्ट्रवादीचा आग्रहराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत नागपूर शहरामध्ये तीन जागा मिळायला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतल्याची माहिती ना. अनिल देशमुख यांनी दिली. मुंबईच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते हजर होते. जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येऊन नागपूर शहरामध्ये आजपर्यंत काँँग्रेसने राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार नागपूर शहरात उभे करणे आवश्यक असल्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांनी लावून धरला. त्यामुळे नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यात दिल्या पाहिजे, असा विचार नेत्यांनी मांडल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले.