शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

- तर विदर्भ वेगळा होणे आवश्यक

By admin | Updated: September 4, 2014 00:55 IST

विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

अनिल देशमुख यांचे मत : लोकांचे बहुमत असावेनागपूर : विदर्भातील जनतेने बहुमताने वेगळा विदर्भ झाला पाहिजे, अशी मागणी केल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिली.विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे मुंबईत मंगळवारी प्रचाराचा नारळ फोडला. त्या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाला विरोध केला. त्यावर ना. देशमुख यांनी मत व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाची मागणी ही बरीच जुनी आहे. परंतु, याआधी या मागणीला जनतेचा पाठिंबा नव्हता. ही मागणी लोकांनी केलेली नव्हती. आता मात्र स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील जनता पुढे आली आहे. त्यामुळे या आंदोलनाची दखल राजकीय पक्षांनी घेणे गरजेचे आहे. वेगळ्या विदर्भासाठी विदर्भातील विद्यार्थ्यांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत जनजागृती झालेली आहे. त्या जनजागृतीमुळेच मोठ्या संख्येने या आंदोलनात विदर्भातील जनता सहभागी होत आहे. रस्त्यावर उतरत आहे.वेगळ्या विदर्भ राज्यासाठी विदर्भात सध्या ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत, मोर्चे निघत आहे. वेगळे विदर्भ राज्य व्हावे अशी विदर्भाचे बहुमत असेल आणि त्या मागणीसाठी वैदर्भीय जनता एकजुटीने उभी राहिल्यास जनतेच्या मागणीचा मान ठेवून वेगळा विदर्भ देणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ना. देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली. (प्रतिनिधी)नागपुरात तीन जागांसाठी राष्ट्रवादीचा आग्रहराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी बैठक झाली. त्यात राष्ट्रवादीला कुठल्याही परिस्थितीत नागपूर शहरामध्ये तीन जागा मिळायला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतल्याची माहिती ना. अनिल देशमुख यांनी दिली. मुंबईच्या राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेससोबत जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते हजर होते. जागावाटपाबाबत चर्चा करण्यात येऊन नागपूर शहरामध्ये आजपर्यंत काँँग्रेसने राष्ट्रवादीला एकही जागा दिली नाही. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार नागपूर शहरात उभे करणे आवश्यक असल्याचा आग्रह वरिष्ठ नेत्यांनी लावून धरला. त्यामुळे नागपूर शहरात विधानसभेच्या सहा जागांपैकी तीन जागा काँग्रेसने राष्ट्रवादीच्या कोट्यात दिल्या पाहिजे, असा विचार नेत्यांनी मांडल्याचे ना. देशमुख यांनी सांगितले.