शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक

By admin | Updated: June 29, 2017 02:34 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न

अनुप कुमार : विदर्भ विकास मंडळाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. विदर्भ विकास मंडळाची बैठक विभागीय आयुक्त, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सूचना करण्यात आल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने विविध पूरक व्यवसायांचा उल्लेख करून विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाची माहिती दिली. या अभियानाची पूर्वतयारी तसेच संबंधितांना प्रशिक्षण या अनुषंगाने आजवर झालेल्या कार्यवाहीचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. आनंद बंग, डॉ. किशोर मोघे, विदर्भ विकास मंडळाच्या सचिव डॉ. निरुपमा डांगे, सहायक संचालक अ. रा. देशमुख, उपायुक्त पी. एम. घाटे उपस्थित होते.मानव व वन्यप्राणी यांच्यातील होणाऱ्या संघर्षाला आळा बसावा, याकरिता उपाययोजना सुचविताना अनुप कुमार म्हणाले की, संरक्षित क्षेत्रातील वाघांची संख्या जास्त झाल्यानंतर काही वाघांचे दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण करावे, विदर्भ विभागात संरक्षित वनक्षेत्रांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत ‘एनआरसीसी’ नागपूर संस्थेकडून अहवाल अपेक्षित आहे. या संस्थेने हे काम जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी शासनस्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशी विनंती आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विदर्भातील विकासाची योजना तयार करण्यासंदर्भातील अहवाल डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी दिली .