शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक

By admin | Updated: June 29, 2017 02:34 IST

शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न

अनुप कुमार : विदर्भ विकास मंडळाची बैठक लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे त्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याकरिता शेतीपूरक व्यवसाय अभियान राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. विदर्भ विकास मंडळाची बैठक विभागीय आयुक्त, विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून सूचना करण्यात आल्या. विदर्भातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने विविध पूरक व्यवसायांचा उल्लेख करून विभागीय आयुक्तांनी ‘तलाव तेथे मासोळी’ अभियानाची माहिती दिली. या अभियानाची पूर्वतयारी तसेच संबंधितांना प्रशिक्षण या अनुषंगाने आजवर झालेल्या कार्यवाहीचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी तज्ज्ञ सदस्य अ‍ॅड. मधुकर किंमतकर, डॉ. कपिल चांद्र्रायण, डॉ. रवींद्र्र कोल्हे, डॉ. आनंद बंग, डॉ. किशोर मोघे, विदर्भ विकास मंडळाच्या सचिव डॉ. निरुपमा डांगे, सहायक संचालक अ. रा. देशमुख, उपायुक्त पी. एम. घाटे उपस्थित होते.मानव व वन्यप्राणी यांच्यातील होणाऱ्या संघर्षाला आळा बसावा, याकरिता उपाययोजना सुचविताना अनुप कुमार म्हणाले की, संरक्षित क्षेत्रातील वाघांची संख्या जास्त झाल्यानंतर काही वाघांचे दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात स्थानांतरण करावे, विदर्भ विभागात संरक्षित वनक्षेत्रांचे एकत्रीकरण करण्यात यावे. विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या समस्या व त्यावरील उपाय याबाबत ‘एनआरसीसी’ नागपूर संस्थेकडून अहवाल अपेक्षित आहे. या संस्थेने हे काम जलदगतीने पूर्ण करावे, यासाठी शासनस्तरावरून सूचना देण्यात याव्यात अशी विनंती आपण करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. बैठकीत विदर्भातील विकासाची योजना तयार करण्यासंदर्भातील अहवाल डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी दिली .