शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

मेट्रो रेल्वेला मनपा बससेवेने जोडणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 02:34 IST

मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल.

ठळक मुद्देमेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल. कोणतीही योजना अमलात आणणे सोपे आहे, पण त्याला लोकोपयोगी बनविणे तेवढेच कठीण आहे. मेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रोच्यावतीने आणि मनपा अणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या (डब्ल्यूआरआय) सहकार्याने ‘एनहान्सिंग द अ‍ॅक्सेस टू अ‍ॅन्ड कनेक्टिव्हिटी आॅफ नागपूर’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे बुधवारी झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर स्मार्ट व सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे, डब्ल्यूआयआयच्या प्रेरणा मेहता आणि छवी ढिंगरा प्रामुख्याने उपस्थित होते.दरदिवशी ३.५ लाख लोक प्रवास करणारदीक्षित म्हणाले, मेट्रो रेल्वेचा उपयोग योग्यरीत्या केल्यास त्याचा लोकांना फायदा मिळेल. नागपूर मेट्रो रेल्वेची लाईन वा स्टेशन बनविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच लोकांना जोडणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० टक्के आहे. त्यानंतरही मेट्रो रेल्वेची गरज का आहे, हे लोकांना अजूनही समजले नाही. लोकांना शहरात लांबचा प्रवास करताना दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे वेळ वाया जातो आणि पैसा खर्च होतो, तसेच अपघात होण्याची शक्यता असते. वाहनांमुळे पर्यावरणाला धोका वाढतो. टीओडीवर चर्चा करताना ते म्हणाले, मेट्रो रेल्वेमुळे ५०० मीटरच्या कॅरिडोरमध्ये व्यावसायिक उपक्रम वाढतील. लोकसंख्येनुसार मेट्रोतून दरदिवशी ३.५० लाख लोक प्रवास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रामनाथ सोनवणे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून परिवर्तन होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. नागपूर शैक्षणिक आणि वैद्यकीय हब बनत आहे. या दिशेने आम्हाला ठोस कार्य करणे आवश्यक आहे.कार्यक्रमाची रूपरेखा संयुक्त महाव्यवस्थापक (मल्टीमॉडेल इन्टिग्रेशन) महेश गुप्ता यांनी सादर केली. संदीप बापट यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी महामेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.