शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणे हे काँग्रेसचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतल्यानंतर ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम आणि पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्क्यावर जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अत्यल्प आणेवारी दाखवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पूर परिस्थिती, बोंडअळी, कीड यासारख्या अनेक अडचणी असतानाही शेतकऱ्यांना कसलीही मदत न देता केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करावे, हे आश्चर्यकारक आहे. पश्चिम विदर्भातील शेतीच्या नुकसानीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर कसलीही मदतीची घोषणा झाली नाही. मदतीसाठी पात्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांना अपात्र ठरवून डावलले. त्यामुळे विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. राज्य सरकारने कोणतेही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले नाही, त्यासाठी निधीही दिला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था माध्यमांनी मांडली आहे. तरीही मुख्यमंत्री, कृषिमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांना भेटून या विषयावर चर्चा करावी लागली. राज्यपालांशी झालेल्या आपल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. याकडे लक्ष घालावे अशी विनंती आपण निवेदनातून केल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी राजभवनवर राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, ललित संदूरकर, संदीप सरोदे, कपिल आदमने आदी उपिस्थत होते.