शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणे हे काँग्रेसचे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न असताना ते दूर करण्याचे सोडून काँग्रेस कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर भेट घेतल्यानंतर ते रविवारी माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, पश्चिम आणि पूर्व विदर्भात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन ही पिके हातची गेली आहेत. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांची आणेवारी ५० टक्क्यावर जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु अत्यल्प आणेवारी दाखवून राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. पूर परिस्थिती, बोंडअळी, कीड यासारख्या अनेक अडचणी असतानाही शेतकऱ्यांना कसलीही मदत न देता केंद्राने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करावे, हे आश्चर्यकारक आहे. पश्चिम विदर्भातील शेतीच्या नुकसानीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्तांनी शासनाकडे अहवाल पाठविला आहे. मात्र त्यावर कसलीही मदतीची घोषणा झाली नाही. मदतीसाठी पात्र असतानाही सरकारने शेतकऱ्यांना अपात्र ठरवून डावलले. त्यामुळे विदर्भातील शेतकरी राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. राज्य सरकारने कोणतेही सिंचनाचे प्रकल्प पूर्ण केले नाही, त्यासाठी निधीही दिला नाही. शेतकऱ्यांची ही अवस्था माध्यमांनी मांडली आहे. तरीही मुख्यमंत्री, कृषिमंत्री ऐकत नाहीत. त्यामुळे राज्यपालांना भेटून या विषयावर चर्चा करावी लागली. राज्यपालांशी झालेल्या आपल्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली. याकडे लक्ष घालावे अशी विनंती आपण निवेदनातून केल्याचे बोंडे यांनी सांगितले. यावेळी राजभवनवर राज्यपालांशी झालेल्या चर्चेदरम्यान भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, आनंदराव राऊत, ललित संदूरकर, संदीप सरोदे, कपिल आदमने आदी उपिस्थत होते.