शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो.

कळमना-कामठी रोड स्थित क्रॉसिंग : संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा विहंग सालगट - नागपूरकामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. या क्रॉसिंगमुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही तर परीक्षेपासून वंचित राहिले. काहींचे करिअर तर जीवावरही बेतले. विशेष म्हणजे, या क्रॉसिंगवरील वाहतुकीची कोंडी दूर करणे शक्य आहे, परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या क्रॉसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथून एनटीपीसीच्या (कोराडी) प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविण्यासाठी रेल्वे मालगाड्यांची वाहतूक होते. पूर्वी येथून मोजक्याच रेल्वे गाड्या धावत होत्या, परंतु कोराडी येथे नवीन प्रकल्प सुरू झाल्याने आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाल्याने मालगाड्यांची संख्या पाचवरून वीस झाली आहे.प्रत्येक मालगाडीला हळू चालावे लागते आणि रेल्वे येण्याच्या काही वेळापूर्वी फाटक बंद केले जाते. रेल्वे प्रशासनाकडून एनटीपीसीशिवाय इतर रेल्वे गाड्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध करून देत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.जर ट्रेन कळमना स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे थांबत असल्यास तर त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग क्रॉसिंगवर असतो. यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवल्या जाते. या क्रॉसिंगच्या काही अंतरावर दुसरे क्रॉसिंग आहे. हे क्रॉसिंग मानवरहित आहे आणि येथूनही कोळशाच्या रेल्वेची वाहतूक होते. या दोन्ही क्रॉसिंगच्या मध्ये एक १५ फुटाचा पूल आहे ज्याच्या खालून रेल्वे जाते. अशी होते वाहतूक विस्कळीतकळमना ते कामठीकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. या क्रॉसिंगच्या दोन्हीकडे मोठ्या संख्येत शाळा व महाविद्यालये आहेत. जवळच रेल्वेचा गिट्टी यार्ड आहे. येथील ट्रकचीही वाहतूक याच मार्गावरून होते. कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते. ग्रामीण भागातील आॅटोरिक्षाचालक प्रवासी बसविण्याच्या स्पर्धेत वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करतात.समस्येच्या निराकरणासाठी उड्डाण पूल आवश्यकसमस्याच्या निराकरणासाठी या मार्गावर उड्डाण पूल आवश्यक आहे. परंतु तूर्तास तरी रेल्वे फाटक बंद ठेवण्याची वेळ कमी करावी.कारण नसताना कळमना स्टेशनवर रेल्वे उभी करू नये.वाहतूक पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी मिळून वाहतूक सुरळीत करावी.