शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जीवघेणे ठरत आहे रेल्वे क्रॉसिंग

By admin | Updated: January 30, 2015 00:52 IST

कामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो.

कळमना-कामठी रोड स्थित क्रॉसिंग : संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा विहंग सालगट - नागपूरकामठी-कळमना रोडवरील (येरखेडा रोड) रेल्वे क्रॉसिंगचे फाटक एकवेळा बंद झाल्यावर २० मिनिटानंतरच उघडते. त्यानंतर विस्कळीत होणारी वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ जातो. या क्रॉसिंगमुळे आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. काही तर परीक्षेपासून वंचित राहिले. काहींचे करिअर तर जीवावरही बेतले. विशेष म्हणजे, या क्रॉसिंगवरील वाहतुकीची कोंडी दूर करणे शक्य आहे, परंतु रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. या क्रॉसिंगचे वैशिष्ट्य म्हणजे, येथून एनटीपीसीच्या (कोराडी) प्रकल्पापर्यंत कोळसा पोहचविण्यासाठी रेल्वे मालगाड्यांची वाहतूक होते. पूर्वी येथून मोजक्याच रेल्वे गाड्या धावत होत्या, परंतु कोराडी येथे नवीन प्रकल्प सुरू झाल्याने आणि कोळशाच्या मागणीत वाढ झाल्याने मालगाड्यांची संख्या पाचवरून वीस झाली आहे.प्रत्येक मालगाडीला हळू चालावे लागते आणि रेल्वे येण्याच्या काही वेळापूर्वी फाटक बंद केले जाते. रेल्वे प्रशासनाकडून एनटीपीसीशिवाय इतर रेल्वे गाड्यांसाठीही हा मार्ग उपलब्ध करून देत असल्याने समस्या निर्माण झाली आहे.जर ट्रेन कळमना स्टेशनवर तांत्रिक बिघाडामुळे थांबत असल्यास तर त्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग क्रॉसिंगवर असतो. यामुळे रेल्वे फाटक बंद ठेवल्या जाते. या क्रॉसिंगच्या काही अंतरावर दुसरे क्रॉसिंग आहे. हे क्रॉसिंग मानवरहित आहे आणि येथूनही कोळशाच्या रेल्वेची वाहतूक होते. या दोन्ही क्रॉसिंगच्या मध्ये एक १५ फुटाचा पूल आहे ज्याच्या खालून रेल्वे जाते. अशी होते वाहतूक विस्कळीतकळमना ते कामठीकडे जाण्यासाठी हा एकच मार्ग आहे. या क्रॉसिंगच्या दोन्हीकडे मोठ्या संख्येत शाळा व महाविद्यालये आहेत. जवळच रेल्वेचा गिट्टी यार्ड आहे. येथील ट्रकचीही वाहतूक याच मार्गावरून होते. कार्यालयीन वेळेत वाहनांची संख्या सर्वाधिक असते. ग्रामीण भागातील आॅटोरिक्षाचालक प्रवासी बसविण्याच्या स्पर्धेत वाहतूक नियमांची सर्रास पायमल्ली करतात.समस्येच्या निराकरणासाठी उड्डाण पूल आवश्यकसमस्याच्या निराकरणासाठी या मार्गावर उड्डाण पूल आवश्यक आहे. परंतु तूर्तास तरी रेल्वे फाटक बंद ठेवण्याची वेळ कमी करावी.कारण नसताना कळमना स्टेशनवर रेल्वे उभी करू नये.वाहतूक पोलीस आणि आरपीएफच्या जवानांनी मिळून वाहतूक सुरळीत करावी.