शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
5
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
6
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
7
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
8
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
9
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
10
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
11
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
12
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
13
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
14
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
15
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
16
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
17
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
18
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?
19
अमानुष! "आजीला सोडून दे", सुनेची वृद्ध सासूला बेदम मारहाण; वाचवण्यासाठी चिमुकल्याची धडपड
20
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...

१०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 20:16 IST

Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. कितीही ताकदवान माणसाचे वजन सरासरी १०० किलोच्या वर नसते. मग एखाद्याला त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलायला लावणे अमानवीय असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू, तांदूळ, सोयाबीनच्या पोत्याचे वजन ५० किलो असते. अजूनही धानाचे पोते ७० किलोचेच आहे.

७० किलोचे पोतेही उचलावे लागते

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पोत्याचे वजन साधारण ५० किलोचे असते. त्यात सोयाबीन, हरभरा, तूर आदींचे पोते ५० किलो तर ७० किलोचे धानाचे पाेते अजूनही उचलावे लागते.

पाठीचे हाड मोडू शकते...

पाठीच्या कण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता होय. सतत जास्त वजनाचे पोते पाठीवर सतत वाहून नेल्याने हळूहळू नैसर्गिक लवचिकता कमी झाल्याने स्नायू आखडतात. प्रसंगी पाठीचे हाड मोडू शकते. हाताच्या सर्व हालचाली करताना खांदे आणि पाठ स्थिर असते. सतत एकाच स्थितीत राहिल्याने मान, पाठीचा कणा स्टिफ बनतो. त्यातून मानदुखी, कंबरदुखीला सुरुवात होते. अशा वेळी पाठ मोकळी असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये हमालाने पाठीवर कमी वजन उचलणे आवश्यक आहे.

आता पोत्याचे वजन ५० किलो

पूर्वी गहू, तांदूळ आणि अन्य कृषिमालाचे १०० किलोचे पोते राहायचे. जास्त पोते वाहून नेणे त्यावेळी कठीण होते. पण जास्त मजुरी मिळत असल्यामुळे न्यावे लागायचे. पण आता बाजार समितीत सर्व मालाचे पोते ५० किलोचे असते.

- शालिक देवासे, कामगार.

आधीच्या तुलनेत आता कृषिमालाच्या पोत्याचे वजन कमी झाले आहे. गहू, तांदूळ, सोयाबीनचे पोते आता ५० किलोचे झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे मजुरीही कमी झाली आहे. आताही तेवढ्याच वजनाची जास्त पोती वजनावर न्यावी लागतात.

- छबलू उके, कामगार.

टॅग्स :Labourकामगार