शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

१०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2021 20:16 IST

Nagpur News केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे.

नागपूर : केंद्र सरकारच्या श्रम आणि कामगार मंत्रालयाने ठरविलेल्या मानांकनानुसार कोणत्याही बाजारपेठेत १०० किलो वजनाचे पोते माणसाने उचलणे अमानवीय असल्याचे ठरविण्यात आले आहे. कितीही ताकदवान माणसाचे वजन सरासरी १०० किलोच्या वर नसते. मग एखाद्याला त्याच्या वजनापेक्षा जास्त वजन उचलायला लावणे अमानवीय असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात सर्वच बाजार समित्यांमध्ये गहू, तांदूळ, सोयाबीनच्या पोत्याचे वजन ५० किलो असते. अजूनही धानाचे पोते ७० किलोचेच आहे.

७० किलोचे पोतेही उचलावे लागते

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारात कामगारांना ५० किलो वजनाच्यावर भार न देण्याच्या सूचना पणन संचालनालयाने दिल्या आहेत. जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये पोत्याचे वजन साधारण ५० किलोचे असते. त्यात सोयाबीन, हरभरा, तूर आदींचे पोते ५० किलो तर ७० किलोचे धानाचे पाेते अजूनही उचलावे लागते.

पाठीचे हाड मोडू शकते...

पाठीच्या कण्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची लवचिकता होय. सतत जास्त वजनाचे पोते पाठीवर सतत वाहून नेल्याने हळूहळू नैसर्गिक लवचिकता कमी झाल्याने स्नायू आखडतात. प्रसंगी पाठीचे हाड मोडू शकते. हाताच्या सर्व हालचाली करताना खांदे आणि पाठ स्थिर असते. सतत एकाच स्थितीत राहिल्याने मान, पाठीचा कणा स्टिफ बनतो. त्यातून मानदुखी, कंबरदुखीला सुरुवात होते. अशा वेळी पाठ मोकळी असणे गरजेचे आहे. बाजार समित्यांमध्ये हमालाने पाठीवर कमी वजन उचलणे आवश्यक आहे.

आता पोत्याचे वजन ५० किलो

पूर्वी गहू, तांदूळ आणि अन्य कृषिमालाचे १०० किलोचे पोते राहायचे. जास्त पोते वाहून नेणे त्यावेळी कठीण होते. पण जास्त मजुरी मिळत असल्यामुळे न्यावे लागायचे. पण आता बाजार समितीत सर्व मालाचे पोते ५० किलोचे असते.

- शालिक देवासे, कामगार.

आधीच्या तुलनेत आता कृषिमालाच्या पोत्याचे वजन कमी झाले आहे. गहू, तांदूळ, सोयाबीनचे पोते आता ५० किलोचे झाले आहे. वजन कमी झाल्यामुळे मजुरीही कमी झाली आहे. आताही तेवढ्याच वजनाची जास्त पोती वजनावर न्यावी लागतात.

- छबलू उके, कामगार.

टॅग्स :Labourकामगार