शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

कोरोनात रेमडेसिविर-टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 09:29 IST

Nagpur news; रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य ठरेल. त्यापेक्षा बाधितांवर पहिल्या पाच दिवसांत उपचार सुरू होणे जास्त महत्त्वाचे आहे असे मत दर्डा हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमचे संचालक डॉ. संजय दर्डा यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे बाधितांसाठी पहिले पाच दिवस गोल्डन पिरियड, उपचार सुरू होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाची सगळीकडे दहशत असताना रुग्ण व नातेवाइकांकडून रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबसाठी पायपीट सुरू आहे. मात्र, प्रत्येक रुग्णाला रेमडेसिविरसारखे इंजेक्शन द्यायची आवश्यकता नाही. फार कमी रुग्णांना याची आवश्यकता भासते. त्यामुळे रेमडेसिविर व टॉसिलिझुमॅबला जीवनरक्षक म्हणणे अयोग्य ठरेल. त्यापेक्षा बाधितांवर पहिल्या पाच दिवसांत उपचार सुरू होणे जास्त महत्त्वाचे आहे. या गोल्डन पिरियडमध्ये उपचार झाले तर रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण निश्चितपणे कमी होते, असे मत दर्डा हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होमचे संचालक डॉ. संजय दर्डा यांनी व्यक्त केले. कोरोना उपचारासंदर्भातील उपचार व गैरसमज यासंदर्भात त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ज्या रुग्णांचा ताप पहिले पाच ते सहा दिवस कमी होत नाही व ऑक्सिजनची पातळी खालावते त्यांना रेमडेसिविर दिले जाते. प्रत्येकाला याची आवश्यकता नाही. डॉक्टरांनीदेखील ही बाब लक्षात घ्यायला हवी. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बाधित व त्यांच्या नातेवाइकांनी मनातून गैरसमज काढायला हवा. ९० टक्के रुग्ण हे केवळ नियमित औषधांनीच ठीक होतात. १० टक्के रुग्णांना दवाखान्यात दाखल करावे लागते व तीन टक्क्यांहून कमी जणांना रेमडेसिविरसारख्या इंजेक्शनची आवश्यकता भासते, तर अर्धा टक्के लोकांना प्लाझ्मा देण्याची वेळ येते. एका संशोधनात प्लाझ्मा दिलेल्या व न दिलेल्या प्रत्येकी ११ हजार रुग्णांवर अभ्यास करण्यात आला. त्यात प्लाझ्मा दिलेल्या रुग्णांना फारसा फायदा झाल्याचे दिसून आले नाही, अशी माहिती डॉ. संजय दर्डा यांनी दिली.

लवकर उपचार महत्त्वाचे, घाबरू नका

सध्या यंत्रणेवर ताण असून, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल यायला उशीर होत आहे. अनेक जण सौम्य लक्षणे असतानादेखील चाचणी करायला जात नाहीत. जर लगेच चाचणी केली तर उपचार लवकर सुरू होऊ शकतात. त्यामुळे चाचणी करायला घाबरू नये. वैद्यकीय तज्ज्ञांनादेखील उपचार देण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जाण्यापासून वाचू शकतो, असे डॉ. दर्डा यांनी स्पष्ट केले.

कोरोनामुक्त झाल्यावरदेखील काळजी घ्या

कोरोनामुक्त झाल्यावरदेखील अनेकांना थकव्यासह विविध त्रास जाणवतात. कोरोनामुळे फुप्फुसांना बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे श्वसनाशी निगडित व्यायामावर भर दिला पाहिजे. सकाळच्या वेळी योगासन, प्राणायाम केल्यास बराच फायदा होऊ शकतो. शिवाय शुद्ध व सात्त्विक आहार घेण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन डॉ. दर्डा यांनी केले.

लसीकरणात स्वयंसेवी संस्थांना समाविष्ट करावे

कोरोनावर ठोस औषध नसल्याने जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणेला मर्यादा आहेत. त्यामुळेच स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधून त्यांनादेखील या प्रक्रियेत सहभागी करायला हवे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढेल, असे प्रतिपादन डॉ. संजय दर्डा यांनी केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस