शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
2
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
3
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
4
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
5
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
6
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
8
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
9
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
10
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
11
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
12
भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
13
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
14
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल
15
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
16
धनश्री वर्माने पोटगीसंदर्भात पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर केलं भाष्य; म्हणाली, "लोक जे बोलतात..."
17
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
18
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
19
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
20
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स

वैदर्भीयांचे प्रेम विसरणे अशक्य; अनुप कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 11:13 IST

वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिली

ठळक मुद्देनागपूर व विदर्भातील कार्यकाळ समाधानकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सनदी अधिकारी म्हणून मी विदर्भात अनेक वर्षे घालवली. यादरम्यान मला शासनासोबतच जनतेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. यासोबतच येथील नागरिकांचे प्रेमही भरभरून मिळाले. वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिलीसिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी त्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.अनुप कुमार यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त म्हणून तब्बल साडेचार वर्षाचा सर्वाधिक कालावधी मला मिळाला. यापूर्वी मी बुलडाण्याचा सीईओ म्हणूनही काम केले. तसेच अकोला जिल्हाधिकरी, महाबीज येथेही कार्य केले आहे. सरकारने माझ्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदरी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. नागपूर व विदर्भातील माझा कार्यकाळ समाधानकारक असा राहिला आहे.पूर्वी विदर्भाबाबत अनेक गैरसमज होते. विदर्भ म्हणजे मागास भाग. मुंबईने सरकारला कमावून द्यावे आणि तो पैसा विदर्भात खर्च करावा, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता तसे नाही.

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाचा लाभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वप्न पाहणारे व ते पूर्ण करणारे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवारसारखे नेतृत्वही नागपूर विदर्भाला लाभल्याने त्याचे फायदे दिसून येत आहेत. चार वर्षात भरपूर कामे झाली. गतीने झाली. नागपूरचे आऊटलेट पूर्णपणे चेंज झाले आहे. नागपूर मेट्रो ही पुण्यातील मेट्रो बनवणार आहे. काही वर्षांपर्यंत ही कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती, असे अनुप कुमार यांनी सांगितले.

विदर्भ-मराठवाडा फोकस राहणारचयापुढेही काम करताना विदर्भ व मराठवाडा हा फोकस राहिलच. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे शासनाचे धोरण आहे. ते राबवीत असताना आपण केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामीण भागात राहणाºया प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर काम करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकार