शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

वैदर्भीयांचे प्रेम विसरणे अशक्य; अनुप कुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 11:13 IST

वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिली

ठळक मुद्देनागपूर व विदर्भातील कार्यकाळ समाधानकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सनदी अधिकारी म्हणून मी विदर्भात अनेक वर्षे घालवली. यादरम्यान मला शासनासोबतच जनतेचे मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळाले. यासोबतच येथील नागरिकांचे प्रेमही भरभरून मिळाले. वैदर्भीय नागरिकांचे हे प्रेम विसरणे माझ्यासाठी अशक्य आहे, अशी भावनिक कबुली पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी येथे दिलीसिव्हिल लाईन्स येथील प्रेस क्लबमध्ये सोमवारी आयोजित ‘मीट द प्रेस’मध्ये पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी त्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत केले.अनुप कुमार यांनी सांगितले की, विभागीय आयुक्त म्हणून तब्बल साडेचार वर्षाचा सर्वाधिक कालावधी मला मिळाला. यापूर्वी मी बुलडाण्याचा सीईओ म्हणूनही काम केले. तसेच अकोला जिल्हाधिकरी, महाबीज येथेही कार्य केले आहे. सरकारने माझ्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदरी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. नागपूर व विदर्भातील माझा कार्यकाळ समाधानकारक असा राहिला आहे.पूर्वी विदर्भाबाबत अनेक गैरसमज होते. विदर्भ म्हणजे मागास भाग. मुंबईने सरकारला कमावून द्यावे आणि तो पैसा विदर्भात खर्च करावा, अशा अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. पण आता तसे नाही.

गडकरी-फडणवीसांच्या नेतृत्वाचा लाभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्वप्न पाहणारे व ते पूर्ण करणारे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे व सुधीर मुनगंटीवारसारखे नेतृत्वही नागपूर विदर्भाला लाभल्याने त्याचे फायदे दिसून येत आहेत. चार वर्षात भरपूर कामे झाली. गतीने झाली. नागपूरचे आऊटलेट पूर्णपणे चेंज झाले आहे. नागपूर मेट्रो ही पुण्यातील मेट्रो बनवणार आहे. काही वर्षांपर्यंत ही कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती, असे अनुप कुमार यांनी सांगितले.

विदर्भ-मराठवाडा फोकस राहणारचयापुढेही काम करताना विदर्भ व मराठवाडा हा फोकस राहिलच. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे हे शासनाचे धोरण आहे. ते राबवीत असताना आपण केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामीण भागात राहणाºया प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर काम करू, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Governmentसरकार