शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

वात्सल्याने वागणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य

By admin | Updated: June 19, 2015 02:45 IST

शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे.

नागपूर : शोभाताई उबगडे यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे नुकसानच झाले नाही तर अनेकांचा प्रेरणास्रोत हरविला आहे. त्यांचे जाणे चटका लावणारे आहे. साहित्य क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्या उबगडे यांचे जाणे सहजासहजी पचवता येण्यासारखे नाही. वात्सल्याने वागणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाला विसरता येणे अशक्य असल्याचे मत यावेळी शोकसभेत विविध मान्यवरांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघाच्यावतीने सांस्कृतिक संकुलातील सभागृहात शोभाताई उबगडे यांना श्रद्धांजली देण्यासाठी श्रद्धांजली सभेचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष वामन तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रा. सुरेश द्वादशीवार म्हणाले, शोभातार्इंच्या निधनाने ही संस्था खचली आहे. सोज्वळ, शालीन कार्यकर्त्या म्हणून त्या सातत्याने या संस्थेत वावरल्या. ही संस्था म्हणजेच त्यांचे कुटुंब होते. संस्थेच्या परीक्षा समितीचे काम त्यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. त्यांच्या निधनाने संस्थेचे फार मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग म्हणाले, शोभाताई या संस्थेची शुभशक्ती होती. त्यांचा वावर सुखद होता. संस्थेत आलेल्या प्रत्येकाची गरज ओळखून त्यांना मदत करण्यात शोभाताई नेहमीच अग्रेसर होत्या. त्या उत्तम लेखिका होत्या. सुप्रिया अय्यर, मेघना वाहोकार यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या. डॉ. विलास चिंतामण देशपांडे म्हणाले, मराठी भाषेतील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. अमराठी लोकांसाठी त्यांनी मराठीचे वर्ग चालविले. त्यांचे दातृत्व आणि औदार्य यांचा अनुभव आम्हाला वेळोवेळी आला आहे. उपाध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, त्या कर्तव्यदक्ष गृहिणी आणि संस्थेतही वात्सल्याने वागणाऱ्या माता आणि प्रसंगी कान पकडणाऱ्या बापाच्या भूमिकेतही होत्या. त्यांचे जाणे आम्हाला पांगळे करणारे आहे. मधुकर कुकडे म्हणाले, अखंड महाराष्ट्र समितीच्या कार्यात त्यांना रस होता. त्यांचे जाणे एका मातेचे जाणे आहे. यावेळी गणेश नायडू, सुरुची डबीर, श्यामकांत कुळकर्णी यांनीही मत व्यक्त केले. वामन तेलंग म्हणाले, शोभाताई संस्थेच्या सरचिटणीस नव्हे पालकही होत्या. संस्था वाढविण्यात आणि माणसे जोडण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रतिभावंत लेखक असलेल्या शोभातार्इंच्या जाण्याने पोरके वाटते. याप्रसंगी एक मिनिट मौन पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेचे संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. याप्रसंगी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)