शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

केल्याने होत आहे रे....

By admin | Updated: January 11, 2017 22:25 IST

आजकालची तरुणाई सामाजिक जबाबदारीपासून दूर पळते आहे, अशी नेहमी ओरड करण्यात येते. मात्र समाजात असेही काही तरुण आहेत, जे ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ असे

-  योगेश पांडे
 
नागपूर,दि.11 - आजकालची तरुणाई सामाजिक जबाबदारीपासून दूर पळते आहे, अशी नेहमी ओरड करण्यात येते. मात्र समाजात असेही काही तरुण आहेत, जे ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ असे मानून नि:स्वार्थपणे कार्य करण्यावर विश्वास करतात. शहरातील युवा पिढीतील अशाच पाच प्रतिनिधींनी एकत्र येऊन विधायक संकल्प घेतला व शहरातील अपघातप्रवण धोकादायक ठिकाणांवर संरक्षण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला. केवळ यावरच ते थांबले नाहीत, तर अपघातांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका पुलावर संरक्षक कठडेदेखील उभारुन प्रशासनाच्या डोळ््यात झणझणीत अंजन टाकले आहे.
गौरी पौनीकर, आशिष काळे, पियुष बोईंनवार नितीन बहादुरे आणि सागर गंधर्व अशी ही या पाच जणांची नावे आहेत. सामाजिक कार्याची अगोदर पासूनच आवड असणारे ते तरुण-तरुणी एकत्र आले. शहरातील अनेक भाग अपघातस्थळ बनले आहेत. मात्र प्रशासनाचे त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा नागरिक म्हणून आपले देखील कर्तव्य आहे, या भावनेतून या सर्वांनी ‘नेशन फर्स्ट’अंतर्गत यासंदर्भात पुढाकार घेण्याचे ठरविले.
शहरातील मानेवाडा चौकाजवळील रिंगरोडवर असलेल्या पुलाचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले होते. रात्रीच्या वेळी अनेक जणांचा येथे अपघात झाला असून आतापर्यंत ८ हून अधिक जणांचा जीव गेला आहे. दररोज तेथून हजारो वाहने जात असतात. परंतु पुलावर कठडे नसल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावर सरंरक्षण भिंत उभारावी, यासाठी वारंवार स्थानिकांनी संबंधित विभाग व प्रशासनाचे लक्षही वेधले. 
 
या पाच जणांनी येथे नववर्षाच्या मुहूर्तावर तात्पुरते कठडे उभारून संरक्षण व्यवस्था उभारली. यासाठी त्यांनी लोकांना सहजपणे दिसतील असे कठडे उभारले व पोलिसांना विनंती करुन येथे ‘बॅरिकेट्स’देखील लावले. शिवाय तात्पुरत्या कठड्यांना ‘रिफ्लेक्टर्स’देखील लावण्यात आले आहेत. या मार्गावर अनेकदा रात्री अंधारच असतो. त्यामुळे आता तात्पुरती संरक्षण व्यवस्था उभी झाल्याने येथे धोका आहे, हे नागरिकांना सहजपणे लक्षात येत आहे. हे कठडे उभारण्यात आल्यापासून येथे एकही अपघात झालेला नाही हे विशेष.