शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

केल्याने होत आहे रे....

By admin | Updated: January 11, 2017 22:25 IST

आजकालची तरुणाई सामाजिक जबाबदारीपासून दूर पळते आहे, अशी नेहमी ओरड करण्यात येते. मात्र समाजात असेही काही तरुण आहेत, जे ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ असे

-  योगेश पांडे
 
नागपूर,दि.11 - आजकालची तरुणाई सामाजिक जबाबदारीपासून दूर पळते आहे, अशी नेहमी ओरड करण्यात येते. मात्र समाजात असेही काही तरुण आहेत, जे ‘समाजसेवा हीच राष्ट्रसेवा’ असे मानून नि:स्वार्थपणे कार्य करण्यावर विश्वास करतात. शहरातील युवा पिढीतील अशाच पाच प्रतिनिधींनी एकत्र येऊन विधायक संकल्प घेतला व शहरातील अपघातप्रवण धोकादायक ठिकाणांवर संरक्षण व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेतला. केवळ यावरच ते थांबले नाहीत, तर अपघातांसाठी प्रसिद्ध असलेल्या एका पुलावर संरक्षक कठडेदेखील उभारुन प्रशासनाच्या डोळ््यात झणझणीत अंजन टाकले आहे.
गौरी पौनीकर, आशिष काळे, पियुष बोईंनवार नितीन बहादुरे आणि सागर गंधर्व अशी ही या पाच जणांची नावे आहेत. सामाजिक कार्याची अगोदर पासूनच आवड असणारे ते तरुण-तरुणी एकत्र आले. शहरातील अनेक भाग अपघातस्थळ बनले आहेत. मात्र प्रशासनाचे त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. प्रत्येक वेळी प्रशासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा नागरिक म्हणून आपले देखील कर्तव्य आहे, या भावनेतून या सर्वांनी ‘नेशन फर्स्ट’अंतर्गत यासंदर्भात पुढाकार घेण्याचे ठरविले.
शहरातील मानेवाडा चौकाजवळील रिंगरोडवर असलेल्या पुलाचे कठडे अनेक वर्षांपासून तुटलेले होते. रात्रीच्या वेळी अनेक जणांचा येथे अपघात झाला असून आतापर्यंत ८ हून अधिक जणांचा जीव गेला आहे. दररोज तेथून हजारो वाहने जात असतात. परंतु पुलावर कठडे नसल्याने हा पूल धोकादायक बनला होता. या पुलावर सरंरक्षण भिंत उभारावी, यासाठी वारंवार स्थानिकांनी संबंधित विभाग व प्रशासनाचे लक्षही वेधले. 
 
या पाच जणांनी येथे नववर्षाच्या मुहूर्तावर तात्पुरते कठडे उभारून संरक्षण व्यवस्था उभारली. यासाठी त्यांनी लोकांना सहजपणे दिसतील असे कठडे उभारले व पोलिसांना विनंती करुन येथे ‘बॅरिकेट्स’देखील लावले. शिवाय तात्पुरत्या कठड्यांना ‘रिफ्लेक्टर्स’देखील लावण्यात आले आहेत. या मार्गावर अनेकदा रात्री अंधारच असतो. त्यामुळे आता तात्पुरती संरक्षण व्यवस्था उभी झाल्याने येथे धोका आहे, हे नागरिकांना सहजपणे लक्षात येत आहे. हे कठडे उभारण्यात आल्यापासून येथे एकही अपघात झालेला नाही हे विशेष.