शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीची क्षमता पाहूनच जलयुक्तचे नियाेजन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

नागपूर : राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले असले तरी त्यामुळे काय लाभ झाला, याबाबत कुणालाच माहिती नाही. वास्तविक ...

नागपूर : राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले असले तरी त्यामुळे काय लाभ झाला, याबाबत कुणालाच माहिती नाही. वास्तविक पाणी साठविण्याची क्षमता त्या क्षेत्रातील जमिनीच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे जलयुक्त शिवारचे नियाेजन त्या जमिनीच्या पाणी मुरण्याच्या क्षमतेचा विचार करूनच करायला हवे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयाेग नियाेजनच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले.

विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित पत्रपरिषदेत औपचारिक चर्चेदरम्यान हे मत व्यक्त करण्यात आले. याबाबत विभागाने राज्यभरातील मृदेचा अभ्यास केला असून, हा अहवाल राज्य शासनाला पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मृदेची क्षमता किती, तिच्यात ओलावा किती, ओलावा टिकविण्याची क्षमता किती, काेणत्या जमिनीत काेणत्या पिकाची लागवड करणे याेग्य राहील, काेणत्या पिकासाठी किती आर्द्रता आवश्यक आहे, याबाबत विभागाने सर्वेक्षण केले असून, हा अहवालही राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वैज्ञानिकांनी यावेळी सांगितले. त्यांनी सध्याची मृदेची परिस्थिती आणि पीक लागवडीची गुंतागुंत याबाबतही माहिती दिली. वातावरणामुळे शेतकरी आणि पिके फार प्रभावित होत आहेत. येणाऱ्या पाच वर्षांत जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर शेतीची माती आणि जलवायूच्या उपलब्धतेनुसार काेणत्या पिकाचे नियाेजन करावे, याबाबत नागपूर ब्युरोच्या वतीने उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

एनबीएसएसचा स्थापना दिवस सोमवारी

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (एनबीएसएस)चा ४५ वा स्थापना दिवस येत्या २३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. अमरावती मार्गावरील एनबीएसएसच्या परिसरात समाराेहाचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. बी.एस. द्विवेदी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी कृषी अनुसंधान व शिक्षा विभाग- भा.कृ.अनु.प.चे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, पद्मश्री विश्व खाद्य पुरस्कारप्राप्त डॉ. रतनलाल यांच्यासह प्राकृतिक संसाधन प्रबंधनाचे उपमहानिर्देशक डॉ. एस.के. चौधरी, डॉ. सी.डी. मायी, पोचराच्या संचालिका इंद्रा मल्लो, डॉ. वाय.जी. प्रसाद, निंबूवर्गीय फळसंशाेधन संस्थेचे संचालक डॉ. डी.के. घोष प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेत डॉ. एन.एस.एस. नागार्जुन, डॉ. एन.जी. पाटील, डॉ. प्रमोद तिवारी आदी उपस्थित होते.