शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

जमिनीची क्षमता पाहूनच जलयुक्तचे नियाेजन शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST

नागपूर : राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले असले तरी त्यामुळे काय लाभ झाला, याबाबत कुणालाच माहिती नाही. वास्तविक ...

नागपूर : राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान राबविले असले तरी त्यामुळे काय लाभ झाला, याबाबत कुणालाच माहिती नाही. वास्तविक पाणी साठविण्याची क्षमता त्या क्षेत्रातील जमिनीच्या क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे जलयुक्त शिवारचे नियाेजन त्या जमिनीच्या पाणी मुरण्याच्या क्षमतेचा विचार करूनच करायला हवे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयाेग नियाेजनच्या वैज्ञानिकांनी व्यक्त केले.

विभागाच्या स्थापना दिनानिमित्त आयाेजित पत्रपरिषदेत औपचारिक चर्चेदरम्यान हे मत व्यक्त करण्यात आले. याबाबत विभागाने राज्यभरातील मृदेचा अभ्यास केला असून, हा अहवाल राज्य शासनाला पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मृदेची क्षमता किती, तिच्यात ओलावा किती, ओलावा टिकविण्याची क्षमता किती, काेणत्या जमिनीत काेणत्या पिकाची लागवड करणे याेग्य राहील, काेणत्या पिकासाठी किती आर्द्रता आवश्यक आहे, याबाबत विभागाने सर्वेक्षण केले असून, हा अहवालही राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे वैज्ञानिकांनी यावेळी सांगितले. त्यांनी सध्याची मृदेची परिस्थिती आणि पीक लागवडीची गुंतागुंत याबाबतही माहिती दिली. वातावरणामुळे शेतकरी आणि पिके फार प्रभावित होत आहेत. येणाऱ्या पाच वर्षांत जिल्हा आणि ब्लॉक स्तरावर शेतीची माती आणि जलवायूच्या उपलब्धतेनुसार काेणत्या पिकाचे नियाेजन करावे, याबाबत नागपूर ब्युरोच्या वतीने उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

एनबीएसएसचा स्थापना दिवस सोमवारी

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेंतर्गत राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरो (एनबीएसएस)चा ४५ वा स्थापना दिवस येत्या २३ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. अमरावती मार्गावरील एनबीएसएसच्या परिसरात समाराेहाचे आयाेजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. बी.एस. द्विवेदी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी कृषी अनुसंधान व शिक्षा विभाग- भा.कृ.अनु.प.चे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, पद्मश्री विश्व खाद्य पुरस्कारप्राप्त डॉ. रतनलाल यांच्यासह प्राकृतिक संसाधन प्रबंधनाचे उपमहानिर्देशक डॉ. एस.के. चौधरी, डॉ. सी.डी. मायी, पोचराच्या संचालिका इंद्रा मल्लो, डॉ. वाय.जी. प्रसाद, निंबूवर्गीय फळसंशाेधन संस्थेचे संचालक डॉ. डी.के. घोष प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. पत्रपरिषदेत डॉ. एन.एस.एस. नागार्जुन, डॉ. एन.जी. पाटील, डॉ. प्रमोद तिवारी आदी उपस्थित होते.