शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बेजबाबदारपणा नागपूर विद्यापीठाचा; एम.काॅम.ची उत्तरपत्रिका तपासली बी.काॅम.च्या उत्तरांवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2023 19:06 IST

Nagpur News नागपूर विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एम.कॉमच्या चौथ्या सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका या बी. कॉमच्या उत्तरांवरून तपासल्या गेल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे८० विद्यार्थ्यांना फटका, पुनर्मूल्यांकनानंतरही चुकीच्या गुणपत्रिका अद्ययावत नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एम.काॅम. चाैथ्या सेमिस्टरच्या ८० विद्यार्थ्यांना सहा महिन्यांपासून झुलावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनी साेडविलेल्या ‘अप्रत्यक्ष कर’ या विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम. ची उत्तरपुस्तिका पाहून तपासण्यात आल्या. परिणामी कमी गुण मिळाले. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तिपटीने वाढलेले आढळले. मात्र, विद्यापीठाने सहा महिने लाेटूनही गुणपत्रिकेत अद्ययावत केले नाही. चुकीच्या गुणांमुळे मुलांचे सीजीपीए रँक घसरले असून, त्यांच्या करिअरवर प्रश्न निर्माण झाला आहे.

हे विद्यार्थी डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या एम.काॅम. च्या २०२०-२०२२ बॅचचे आहेत. जून २०२२ ला झालेल्या चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्ष कर विषयाचा पेपर दिला. १५ जुलै २०२२ ला निकाल जाहीर झाले तेव्हा, या विषयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ ३० गुण मिळाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी या गुणांवर आक्षेप घेतल्यानंतर चाैकशी केली असता एम.काॅम.च्या इंडायरेक्ट टॅक्स विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम.च्या याच विषयाच्या ‘उत्तर की’वरून तपासण्यात आल्याची बाब १६ जुलैलाच उजेडात आली.

विशेष म्हणजे पुनर्मू्ल्यांकनात या विद्यार्थ्यांना संबंधित विषयात ९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविल्याचे लक्षात आले. त्यावेळी प्रभारींनी पुनर्मूल्यांकन करून आठवडाभरात सुधारित गुण विद्यापीठाच्या वेबपेजवर आणि अंतिम गुणपत्रिकेवरही अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सहा महिने लाेटले तरी विद्यापीठाने निकालाच्या पानावर किंवा महाविद्यालयांनी वितरित केलेल्या मूळ गुणपत्रिकेत काेणताही बदल केला नाही.

चुकीच्या गुणांमुळे रँक घसरले

दरम्यान, १२ जानेवारी २०२३ ला विद्यापीठाने या बॅचच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. मात्र, या ८० विद्यार्थ्यांचा सीजीपीए चुकीच्या गुणांवर आधारित असल्याने त्यांची रँक घसरली. सुधारित गुण जाेडल्यास ते रँकसाठी पात्र ठरतील. सुधारित गुणवत्ता यादी तीन-चार दिवसांत अपलाेड करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण पुढे काही झाले नाही. याबाबत महाविद्यालयाचे अधिकाऱ्यांनी विद्यापीठ काौन्सिलशी संवाद साधत असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांना तक्रार

सहा महिन्यांपासून सुधारित गुणांसह गुणपत्रिका अद्ययावत हाेत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागताे आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठांकडूनही विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष हाेत असल्याने या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ