शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

बेजबाबदारपणा नागपूर विद्यापीठाचा; एम.काॅम.ची उत्तरपत्रिका तपासली बी.काॅम.च्या उत्तरांवरून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2023 19:06 IST

Nagpur News नागपूर विद्यापीठाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एम.कॉमच्या चौथ्या सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका या बी. कॉमच्या उत्तरांवरून तपासल्या गेल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्दे८० विद्यार्थ्यांना फटका, पुनर्मूल्यांकनानंतरही चुकीच्या गुणपत्रिका अद्ययावत नाही

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या बेजबाबदारपणामुळे एम.काॅम. चाैथ्या सेमिस्टरच्या ८० विद्यार्थ्यांना सहा महिन्यांपासून झुलावे लागत आहे. या विद्यार्थ्यांनी साेडविलेल्या ‘अप्रत्यक्ष कर’ या विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम. ची उत्तरपुस्तिका पाहून तपासण्यात आल्या. परिणामी कमी गुण मिळाले. पुनर्मूल्यांकन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण तिपटीने वाढलेले आढळले. मात्र, विद्यापीठाने सहा महिने लाेटूनही गुणपत्रिकेत अद्ययावत केले नाही. चुकीच्या गुणांमुळे मुलांचे सीजीपीए रँक घसरले असून, त्यांच्या करिअरवर प्रश्न निर्माण झाला आहे.

हे विद्यार्थी डाॅ. आंबेडकर महाविद्यालयाच्या एम.काॅम. च्या २०२०-२०२२ बॅचचे आहेत. जून २०२२ ला झालेल्या चाैथ्या सेमिस्टरच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी अप्रत्यक्ष कर विषयाचा पेपर दिला. १५ जुलै २०२२ ला निकाल जाहीर झाले तेव्हा, या विषयामध्ये विद्यार्थ्यांना केवळ ३० गुण मिळाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांनी या गुणांवर आक्षेप घेतल्यानंतर चाैकशी केली असता एम.काॅम.च्या इंडायरेक्ट टॅक्स विषयाच्या उत्तरपत्रिका बी.काॅम.च्या याच विषयाच्या ‘उत्तर की’वरून तपासण्यात आल्याची बाब १६ जुलैलाच उजेडात आली.

विशेष म्हणजे पुनर्मू्ल्यांकनात या विद्यार्थ्यांना संबंधित विषयात ९० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविल्याचे लक्षात आले. त्यावेळी प्रभारींनी पुनर्मूल्यांकन करून आठवडाभरात सुधारित गुण विद्यापीठाच्या वेबपेजवर आणि अंतिम गुणपत्रिकेवरही अद्ययावत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, सहा महिने लाेटले तरी विद्यापीठाने निकालाच्या पानावर किंवा महाविद्यालयांनी वितरित केलेल्या मूळ गुणपत्रिकेत काेणताही बदल केला नाही.

चुकीच्या गुणांमुळे रँक घसरले

दरम्यान, १२ जानेवारी २०२३ ला विद्यापीठाने या बॅचच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली. मात्र, या ८० विद्यार्थ्यांचा सीजीपीए चुकीच्या गुणांवर आधारित असल्याने त्यांची रँक घसरली. सुधारित गुण जाेडल्यास ते रँकसाठी पात्र ठरतील. सुधारित गुणवत्ता यादी तीन-चार दिवसांत अपलाेड करण्याचे आश्वासन देण्यात आले, पण पुढे काही झाले नाही. याबाबत महाविद्यालयाचे अधिकाऱ्यांनी विद्यापीठ काौन्सिलशी संवाद साधत असल्याचे सांगितले.

उपमुख्यमंत्र्यांना तक्रार

सहा महिन्यांपासून सुधारित गुणांसह गुणपत्रिका अद्ययावत हाेत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागताे आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठांकडूनही विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष हाेत असल्याने या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ