शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

बेजबाबदारपणा संकटाला निमंत्रण तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाची साखळी खंडित व्हावी, यासाठी नागपूर शहरात कठोर निर्बंध लावण्यात आले. नागरिकांनीही याला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणाची साखळी खंडित व्हावी, यासाठी नागपूर शहरात कठोर निर्बंध लावण्यात आले. नागरिकांनीही याला प्रतिसाद दिल्याने संक्रमणाला आळा बसला. परंतु शहरातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याला सुरुवात होताच काही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसत आहेत. सकाळी ११ पर्यंत आवश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचे मनपा प्रशासनाचे आदेश आहे. परंतु या आदेशाचे उल्लंघन होत आहे. काही नागरिकांचा बेजबाबदारपणा संभाव्य संकटाला निमंत्रण तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील प्रमुख बाजार व पोलीस तैनात असलेली ठिकाणे वगळता शहरालगतचा भाग, वस्त्यात नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. दुकाने दुपारपासून सायंकाळपर्यत उघडी ठेवली जातात. पूर्व नागपूर असो की पश्चिम, दक्षिण, दक्षिण-पश्चिम, उत्तर व मध्य नागपुरात अशीच परिस्थिती आहे. भाजीपाला, फळ विक्रेत्यांची दुकाने रस्त्याच्या बाजूला लागतात. पोलीस वा मनपाच्या पथकाला बघताच पळून जातात. काही वेळानंतर पुन्हा येतात. दुकाने लावल्याने कोरोना संक्रमण होत नसल्याचे काही दुकानदारांचे म्हणणे आहे. अनेक दुकानदार मास्क वापरत नाही. सुरक्षित अंतर पाळले जात नाही.

पूर्व नागपुरातील कळमना व पारडी भागाचा फेरफटका मारला तर सर्वकाही सुरळीत सुरू असल्याचे दिसून येईल. गुलमोहरनगर चौकात आठवडी बाजार भरतो. सध्या परवानगी नसतानाही बुधवारी सायंकाळी बाजार भरला. भाजीपाला, फळे याशिवाय कापड विक्रेते व हातगाड्यावर दुकाने लागली होती. वाठोडा बाजारातही असेच चित्र आहे. जयताळा, सक्करदरा, इतवारी भाजीबाजारातही अशीच परिस्थिती आहे. शहरात ठिकठिकाणी फळविक्रेते व दुकाने दिसतात. यावर आक्षेप नाही. परंतु मास्क वापरत नाही, सुरक्षित अंतर पाळले जात नाही.

.......

घोळक्याने मॉर्निंग वॉक

शहरातील उद्याने शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आलेली आहेत. परंतु नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात. संक्रमणाचा अधिक धोका असताना फिरणाऱ्यांची गर्दी नव्हती. परंतु गेल्या काही दिवसात घोळक्याने मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जपानी गार्डन, सेमिनरी हिल्स आदी भागात सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी असते. दक्षिण नागपुरातील वंजारीनगर पाणी टाकी, रेशीमबाग परिसरात नागरिक फिरताना दिसतात. आरोग्यासाठी फिरणे चांगले असले तरी संक्रमणाचा धोका विचारात घेता खबरदारी आवश्यक आहे. गर्दी होणाार नाही याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.