शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

यवतमाळमधील ३०२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:30 IST

३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव सहन करू शकत नाही. त्यामुळे पाईप फुटतात व बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शेतपिकाचे नुकसान होते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देहायकोर्टात जनहित याचिका : निकृष्ट दर्जाचे पाईप्स वापरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ३०२ कोटी रुपयाच्या बेंबळा-यवतमाळ अमृत पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला आहे. या योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात आले. ते पाईप पाणी व हवा यांचा दबाव सहन करू शकत नाही. त्यामुळे पाईप फुटतात व बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे शेतपिकाचे नुकसान होते असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.नाशिक येथील मे. पी.एल. अडके यांना या प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यासाठी पश्चिम बंगाल येथील मे. जय बालाजी इंडस्ट्रीज यांच्याकडून पाईप्स खरेदी करण्यात आले असून पाईप्सचा दर्जा तपासण्याची जबाबदारी मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांच्याकडे आहे. परंतु, या तिघांसह सरकारी अधिकाऱ्यांनी नि:स्वार्थीपणे कर्तव्य बजावले नाही. त्यांनी आर्थिक गैरव्यवहार करून योजनेत निकृष्ट दर्जाचे पाईप्स वापरले. त्यामुळे पाणी सोडल्यानंतर निर्माण होणाऱ्या दबावामुळे पाईप्स फुटतात व आजूबाजूच्या शेतपिकाचे नुकसान होते. अशा घटना वारंवार घडत आहेत. योजनेतील पाईप्स दर्जा तपासण्यासाठी व्हीएनआयटीकडे पाठविण्यात आले होते. व्हीएनआयटीने १९ जुलै २०१८ रोजी अहवाल सादर करून पाईप्स निकषानुसार नसल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांनीही पाईप्सचा दर्जा निकृष्ट असल्याचा अहवाल सादर केला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी व दोषी फर्मस्ना काळ्या यादीत टाकण्यात यावे असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.राज्य सरकारला नोटीसयाचिकेवर बुधवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता राज्याचे नगर विकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, मुख्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, यवतमाळ जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, नगर परिषद मुख्याधिकारी, मे. पी. एल. अडके, मे. जय बालाजी इंडस्ट्रीज व मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. अ‍ॅड. शशिभूषण वहाणे यांनी याचिकेचे कामकाज पाहिले.बिल थांबविण्याची विनंतीयाचिकेवर निर्णय होतपर्यंत मे.पी.एल. अडके, मे. जय बालाजी इंडस्ट्रीज व मे. क्वॉलिटी सर्व्हिसेस अ‍ॅन्ड सोल्युशन्स यांची बिले थांबविण्याची विनंती सुनावणीदरम्यान न्यायालयाला करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने या विनंतीचा आदेशात उल्लेख करून त्यावर पुढच्या तारखेला विचार करण्यात येईल असे स्पष्ट केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयYavatmalयवतमाळ