शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

निमखेडा योजनेच्या कालव्याला भेगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:08 IST

रेवराल : पेंच प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या निमखेडा योजनेच्या डाव्या कालव्याला भेगा पडलेल्या आहेत. भंडाराकडे जाणारा हा कालवा सुमारे पाच महिन्यापासून ...

रेवराल : पेंच प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या निमखेडा योजनेच्या डाव्या कालव्याला भेगा पडलेल्या आहेत. भंडाराकडे जाणारा हा कालवा सुमारे पाच महिन्यापासून नादुरुस्त असल्याने कालव्याला पाणी सोडण्यात आले नाही. पाण्याची सुविधाच नसल्याने परिसरातील धान रोवणी थांबली आहे. भंडाराकडे जाणारा हा कालवा आहे. या संपूर्ण प्रकारामुळे हजारो एकर पीक संकटात सापडले असून तातडीने उपाययोजना करण्यात न आल्यास हजारो एकर शेतीवर संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे.

रामटेक पेंच पाटबंधारे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाच महिन्यापूर्वी सदर समस्या मांडण्यात आली. अधिकाऱ्यांनी या समस्येकडे कानाडोळा केला. अखेरीस शेतकऱ्यांना धान रोवणीची कामे थांबवावी लागली. एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादकांसमोर पेच निर्माण झाला असताना दुसरीकडे हाकेच्या अंतरावर पाणी असूनही उपयोगाचे नाही, अशी दयनीय अवस्था आहे. शेतालाच लागून कालवा असून अन्य साधन शेतकऱ्याकडे उपलब्ध नाही. शिवाय धान रोवणीला मुबलक पाणी लागते. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी चिंतेत अडकले आहेत. प्रस्तूत प्रतिनिधीने रामटेक पेंच पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता, कालव्याची दुरूस्ती लवकरच करणार असल्याचे सांगितले.

---

शेतमजुरांवरही संकट

मौदा तालुक्यात धान पट्टा मोठा आहे. अशावेळी बहुतांश शेतमजूर लगतच्याच भंडारा जिल्ह्यातून येत असतात. आता कालव्याचे पाणीच बंद असल्याने शेतमजुरांवर सुद्धा घरीच राहण्याची वेळ आलेली आहे. फुटलेल्या कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.

-

कालव्याचे काम २४ जुलैपासून सुरू केले. २६ जुलैपासून पाऊस अधिक झाल्याने कामात अडथळा निर्माण झालेला आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करू आणि पाणी सोडू.

राजू बोंबले, उपविभागीय अधिकारी

पेंच पाटबंधारे विभाग रामटेक

----

पेंच प्रकल्प अधिकाऱ्यांना मार्च महिन्यापूर्वीच ही समस्या सांगितली. अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यांच्या दुर्लक्षितपणामुळेच हजारो एकर शेती संकटात सापडली आहे. आधीच दुरुस्तीचे काम झाले असते, तर ही वेळ शेतकऱ्यांवर आली नसती.

सुरेश सज्जा

शेतकरी, खापरखेडा

280721\3202img-20210726-wa0021.jpg

पाण्याविना हजारो एकर जमीन संकटात फोटो