शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

पालक आणि मुलांमधील सुसंवादच महत्त्वाचा

By admin | Updated: December 31, 2014 01:06 IST

हल्ली प्रेम म्हणजे काय, तेच नेमकेपणाने कळत नाही. प्रेमाची परिभाषाच बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आणि भावनांची सूक्ष्मता, संवेदनांचा टोकदारपणा जरासा हरविला.

विविध मान्यवर तज्ज्ञांची मते : ‘हो आहे माझा बॉयफ्रेंड’ एक अनोखा कार्यक्रम नागपूर : हल्ली प्रेम म्हणजे काय, तेच नेमकेपणाने कळत नाही. प्रेमाची परिभाषाच बदलली आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आणले आणि भावनांची सूक्ष्मता, संवेदनांचा टोकदारपणा जरासा हरविला. ‘युज अँड थ्रो’ या संकल्पनेसारखे प्रेम कधीच असू शकत नाही. आकर्षण, प्रेम आणि समर्पण या तीन वेगळ्या बाबी आहेत पण त्याच्या सीमारेषाही पुसट आहेत. उमलत्या वयात त्या कळू शकत नाही. यासाठी चांगले काय आणि वाईट काय, याचा सद्सद्विवेक असायला हवा. तो पालक आणि मुलांमधल्या सुसंवादातूनच शक्य आहे, असा सूर सर्वच मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केला. मुलामुलींचे बायफ्रेंड आणि गर्लफ्रेंड हल्ली नियमच झाला आहे. यातून मुलांना कसे सावरायचे आणि संस्कारित करायचे, हा प्रश्न प्रत्येकच पालकांचा आहे. नव्या पिढीच्या वर्तनाचा आणि निकोप नातेसंबंधांचा प्रश्न चर्चेला घेणारा हा कार्यक्रम विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्यावतीने साई सभागृहात आयोजित करण्यात आला. यात मानसशास्त्रज्ञ राजा आकाश, मानसोपचारतज्ज्ञ डॉ़ शैलेश पानगावकर, लैंगिक उपचारतज्ज्ञ डॉ़ संजय देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी, शैलेश पांडे, प्रगती पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ऋचा धाक्रस, प्रतिक गायकवाड, गौरव अंबारे, काजल काटे, समीर तभाने, श्रीरंग यांनी चर्चेत सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीश गांधी होते. तत्पूर्वी ‘हो आहे माझा बॉयफ्रेण्ड’ ही धनंजय मांडवकर लिखित व संदीप दाबेराव दिग्दर्शित लघुनाटिका सादर करण्यात आली़ कार्यक्रमाचे समन्वयन व निवेदन मनिषा साधू यांनी केले़याप्रसंगी शैलेश पांडे म्हणाले, प्रतिष्ठा आणि सामाजिक नियमांच्या चौकटीमुळे पालकांचा मुलांशी संवाद होत नाही. संवाद तुटला की, चांगल्या-वाईटाचा फरक कळत नाही आणि पाऊल वाकडे पडते. ज्यांच्या गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड बदलत राहतात त्यांना प्रेम कळतच नाही, तो केवळ टाइमपासच असतो. बाळ कुळकर्णी म्हणाले, प्रेमाच्या नावावर सावळा गोंधळ सुरू आहे. प्रेम जीवघेणे नव्हे जीवनदायी असते. जेथे भीती असते तेथे प्रीती नसते. प्रेमाला अनेक पदर असतात आणि त्यात विश्वास महत्त्वाचा धागा असतो. राजा आकाश आणि पानगावकर यांनी प्रत्येक नात्यात परस्पर संवादालाच महत्त्व असल्याचे सांगितले. संजय देशपांडे यांनी प्रत्येक स्थितीत मुलामुलींना विश्वासाने समजून घेणे अतिशय महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. गिरीश गांधी यांनी मुलांसाठी कुटुंबच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)