शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

वन विभागाचे आंतरराज्यीय नाके सताड उघडे

By admin | Updated: September 1, 2014 01:05 IST

वनरक्षक, वनपालांच्या बेमुदत संपामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या नाक्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या नाक्यांवरुन साग तस्करीला

कर्मचारी संपाचा परिणाम : साग तस्करीला आले उधाणगणेश वासनिक - अमरावतीवनरक्षक, वनपालांच्या बेमुदत संपामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या नाक्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या नाक्यांवरुन साग तस्करीला उधाण आले आहे. आंतरराज्यीय वन नाक्यावर अधिकारी बेपत्ता असल्याने मध्य प्रदेशात सागवान वृक्षांची कटाई करुन ते चोरट्या मार्गाने पाठविले जात आहेत. मेळघाट, चंद्रपूर या भागांतून सर्वाधिक साग तस्करी होत असल्याची माहिती आहे.राज्यभरातील २५ हजार वनपाल, वनरक्षक वेतनवाढीच्या मुद्यावरुन २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा सातवा दिवस असताना शासन कोणताही तोडगा काढण्याच्या निर्णयापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे संपकरी वनरक्षक, वनपालदेखील वेतन वाढीसाठी अडून बसल्याचे चित्र आहे. वनपाल, वनरक्षकांच्या म्हणण्यानुसार, जंगल, वनांचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोकडे वेतन देण्यामागील शासनाने भूमिका स्पष्ट करावी. राज्य शासनाला दरवर्षी वनविभागाकडून कोट्यवधीचे उत्पन्न मिळत असताना वेतनवाढीच्या न्याय्य मागणीला नकार देणे संयुक्तिक नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे संपामुळे गेल्याने मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांवर जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आपसुकच आली आहे. मात्र वनपाल, वनरक्षक हा वनविभागात अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने संपकाळात एखादी घटना घडल्यास कायदेशीर कारवाईची बाजू कोणी हाताळावी, हा खरा सवाल उपस्थित होत आहे. या संपामुळे वरिष्ठ वनअधिकारी हतबल तर तस्करांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जारीदा, हतरु, चौराकुंड, हरिसाल, भोकरबर्डी, खटकाली, मेमना, सेमाडोह, ढाकणा, धारगड, कोकटू, कोहा, धामणगाव गढी, बोराडा या नाक्यावरुन साग तस्करी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. या नाक्यावर नाममात्र वनमजूर कार्यरत असून या मजुरांना वाहने अडविणे किंवा तपासणीचे कोणतेही अधिकार नसल्याने हे नाके हल्ली केवळ शोभेच्या वास्तू ठरत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून महाराष्ट्र ते मध्य प्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीच्या वेळी सुरु राहता कामा नये, अशी शासन नियमावली आहे. मात्र या संपाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मध्यप्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीला बिनदिक्कतपणे सुरु असून साग तस्करी होत आहे. मागील सात दिवसांच्या या संपामुळे वनविभागाची कोट्यवधीची वनसंपदा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. मेळघाटातील राज्य मार्ग खुला झाल्याने वाघ तस्करी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जंगलातही सागतस्करी वाढली असून आंध्रप्रदेशात चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे.