शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाचे आंतरराज्यीय नाके सताड उघडे

By admin | Updated: September 1, 2014 01:05 IST

वनरक्षक, वनपालांच्या बेमुदत संपामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या नाक्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या नाक्यांवरुन साग तस्करीला

कर्मचारी संपाचा परिणाम : साग तस्करीला आले उधाणगणेश वासनिक - अमरावतीवनरक्षक, वनपालांच्या बेमुदत संपामुळे जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाच्या नाक्यावर मनुष्यबळाचा अभाव असल्याने या नाक्यांवरुन साग तस्करीला उधाण आले आहे. आंतरराज्यीय वन नाक्यावर अधिकारी बेपत्ता असल्याने मध्य प्रदेशात सागवान वृक्षांची कटाई करुन ते चोरट्या मार्गाने पाठविले जात आहेत. मेळघाट, चंद्रपूर या भागांतून सर्वाधिक साग तस्करी होत असल्याची माहिती आहे.राज्यभरातील २५ हजार वनपाल, वनरक्षक वेतनवाढीच्या मुद्यावरुन २५ आॅगस्टपासून बेमुदत संपावर गेले आहेत. संपाचा आजचा सातवा दिवस असताना शासन कोणताही तोडगा काढण्याच्या निर्णयापर्यंत पोहचले नसल्याचे दिसून येते. शासनाच्या नकारात्मक भूमिकेमुळे संपकरी वनरक्षक, वनपालदेखील वेतन वाढीसाठी अडून बसल्याचे चित्र आहे. वनपाल, वनरक्षकांच्या म्हणण्यानुसार, जंगल, वनांचे संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तोकडे वेतन देण्यामागील शासनाने भूमिका स्पष्ट करावी. राज्य शासनाला दरवर्षी वनविभागाकडून कोट्यवधीचे उत्पन्न मिळत असताना वेतनवाढीच्या न्याय्य मागणीला नकार देणे संयुक्तिक नाही, असा आरोप करण्यात आला आहे. तर दुसरीकडे संपामुळे गेल्याने मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वन कर्मचाऱ्यांवर जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी आपसुकच आली आहे. मात्र वनपाल, वनरक्षक हा वनविभागात अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याने संपकाळात एखादी घटना घडल्यास कायदेशीर कारवाईची बाजू कोणी हाताळावी, हा खरा सवाल उपस्थित होत आहे. या संपामुळे वरिष्ठ वनअधिकारी हतबल तर तस्करांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येते. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत जारीदा, हतरु, चौराकुंड, हरिसाल, भोकरबर्डी, खटकाली, मेमना, सेमाडोह, ढाकणा, धारगड, कोकटू, कोहा, धामणगाव गढी, बोराडा या नाक्यावरुन साग तस्करी वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. या नाक्यावर नाममात्र वनमजूर कार्यरत असून या मजुरांना वाहने अडविणे किंवा तपासणीचे कोणतेही अधिकार नसल्याने हे नाके हल्ली केवळ शोभेच्या वास्तू ठरत आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून महाराष्ट्र ते मध्य प्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीच्या वेळी सुरु राहता कामा नये, अशी शासन नियमावली आहे. मात्र या संपाचा फटका मोठ्या प्रमाणात बसल्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून मध्यप्रदेशात जाणारा राज्य मार्ग रात्रीला बिनदिक्कतपणे सुरु असून साग तस्करी होत आहे. मागील सात दिवसांच्या या संपामुळे वनविभागाची कोट्यवधीची वनसंपदा चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे. मेळघाटातील राज्य मार्ग खुला झाल्याने वाघ तस्करी होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जंगलातही सागतस्करी वाढली असून आंध्रप्रदेशात चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे.