शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेसाठी तदर्थ समिती : हायकोर्टाने मागितली नावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:41 IST

१६ वर्षांखालील आंतरजिल्हा राज्य बास्केटबॉल स्पर्धा कायदेशीररीत्या आयोजित करण्यासाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने तदर्थ समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची नावे बुधवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर करायची आहेत. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश दिला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेला धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १६ वर्षांखालील आंतरजिल्हा राज्य बास्केटबॉल स्पर्धा कायदेशीररीत्या आयोजित करण्यासाठी बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने तदर्थ समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्या समितीमध्ये समावेश करण्यात येणाऱ्या प्रतिनिधींची नावे बुधवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर करायची आहेत. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व श्रीराम मोडक यांनी मंगळवारी यासंदर्भात आदेश दिला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.फेडरेशनने गत १ मार्च रोजी राज्य संघटनेची संलग्नता विविध कारणांनी स्थगित केली. तसेच, संघटनेचे स्पर्धा आयोजित करण्याचे अधिकार काढून घेतले. परिणामी, ही संघटना कोणतीही स्पर्धा आयोजित करू शकत नाही. असे असताना, संघटनेने २ एप्रिल रोजी परिपत्रक जारी करून आंतरजिल्हा स्पर्धा जाहीर केली. सातारा येथे आयोजित या स्पर्धेला २ मेपासून सुरुवात होणार आहे. त्याविरुद्ध नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेसह एकूण १२ जिल्हा संघटनांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. फेडरेशनसोबतची संलग्नता स्थगित असल्यामुळे राज्य संघटनेला ही स्पर्धा घेण्याचा अधिकार नाही. नियमांचा विचार केल्यास या स्पर्धेला काहीच महत्त्व राहणार नाही. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेतली जाणार नाही. त्यांना सरकारी योजनांचे फायदे दिले जाणार नाहीत. संघटनेच्या अवैध कारभारामुळे शेकडो खेळाडूंचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ही स्पर्धा महासंघाने स्वत:च्या निरीक्षणाखाली व नियंत्रणाखाली आयोजित करावी, राज्य संघटनेला ही स्पर्धा घेण्याचा अधिकार नसल्याचे घोषित करण्यात यावे व स्पर्धेचे वादग्रस्त परिपत्रक रद्द करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.याचिकेवर मंगळवारी दीर्घ सुनावणी झाली. दरम्यान, महासंघाने अशा प्रकरणामध्ये ते तदर्थ समिती स्थापन करतात व त्यानंतर तदर्थ समिती स्पर्धा आयोजन समितीची स्थापना करते, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तत्काळ तदर्थ समिती स्थापन करण्याचा आदेश महासंघाला दिला. तसेच, समितीमध्ये कुणाकुणाचा समावेश केला जाणार आहे, त्याची माहिती बुधवारी सकाळी १०.३० वाजतापर्यंत सादर करण्यास सांगितले. तदर्थ समिती स्थापन झाल्यानंतर ती समिती ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी स्थानिक क्रीडा तज्ज्ञांची आयोजन समिती स्थापन करेल. त्यानंतर या स्पर्धेसंदर्भात पुढील आवश्यक निर्णय घेतले जातील. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ वकील श्रीहरी अणे व अ‍ॅड. एस. एस. सान्याल, राज्य संघटनेतर्फे वरिष्ठ वकील सुनील मनोहर तर, फेडरेशनतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी कामकाज पाहिले.१४ मेपासून राष्ट्रीय स्पर्धा१४ मेपासून १६ वर्षांखालील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्या स्पर्धेसाठी या आंतरजिल्हा स्पर्धेतून मुलांचा व मुलींचा जिल्हा संघ निवडला जाणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा कायदेशीररीत्या आयोजित करणे आवश्यक आहे. राज्य संघटनेने स्पर्धा घेतल्यास ती अवैध ठरेल. परिणामी, राज्य संघांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ दिले जाणार नाही. त्याचा फटका खेळाडूंना बसेल. ही बाब लक्षात घेता, फेडरेशनच्या तदर्थ समितीकडे स्पर्धेची सूत्रे सोपविण्यात येणार आहेत. राज्यात दरवर्षी १३, १६ व १८ वर्षांखालील आणि खुल्या गटात आंतरजिल्हा राज्य स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी ही पहिली स्पर्धा होय. राज्य संघटनेला इतर स्पर्धांपासूनही दूर ठेवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साताऱ्यातील स्पर्धेत मुलांचे २६ तर, मुलींचे २४ जिल्हा संघ सहभागी झाले आहेत. काही संघ साताऱ्यात पोहचलेदेखील आहेत. स्पर्धेवर आतापर्यंत ५० लाख रुपये खर्च झाल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.खेळाडूंचे नुकसान व्हायला नकोआंतरजिल्हा राज्य स्पर्धा कायदेशीररीत्या आयोजित झाली पाहिजे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना नियमानुसार सर्व लाभ मिळायला हवेत. त्यांना राष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होता आले पाहिजे. त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान व्हायला नको, असे मत न्यायालयाने सुनावणीदरम्यान व्यक्त केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBasketballबास्केटबॉल