शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
5
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
6
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
7
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
8
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
9
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
10
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
11
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
12
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
13
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
14
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
15
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
16
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
17
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
18
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
19
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
20
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?

बिहार बाबासाहेबांची प्रेरणाभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 03:56 IST

राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते

राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन नागपूर :राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वाेच्च मानले. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याला सुरुवात केली. अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनी आपले विचार मांडले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य अ‍ॅड. मा.मा. येवले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुधीर फुलझेले, डी.जी. दाभाडे, विलास गजघाटे व्यासपीठावर होते. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले तर आभार विजय चिकाटे यांनी मानले. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते साप्ताहिक रिपब्लिकन संदेशचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे यांच्या बुद्ध-भीम गीताने झाली. समारोप राष्ट्रगीताने झाला. (प्रतिनिधी)तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल - रामदास आठवले यावेळी रामदास आठवले म्हणाले, कोणी कितीही मोठे मोर्चे काढले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद रद्द होणार नाही. अ‍ॅट्रॉसिटी ह अन्याय करणारा कायदा नसून रक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा रद्द करण्याची वेळ आलीच तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे यावेळी त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांना, बुद्धाला आणि संविधानाला मानतात. त्यामुळे संविधान कधीच बदलणार नाही. संविधान बललले तर देश बदलेल. दीक्षाभूमीची जागा आता कमी पडू लागली आहे. तेव्हा स्मारक समितीला हवी तितकी जागा सरकारने द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केली. तसेच सध्या मी केंद्रात तीन वर्ष मंत्री आहे, त्यामुळे स्मारक समितीला जे काही हवे असेल ते त्यांनी मागावे मी देईल, असेही सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काही कविताही सादर केल्या.