शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

बिहार बाबासाहेबांची प्रेरणाभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2016 03:56 IST

राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते

राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे प्रतिपादन नागपूर :राज्यपाल रामनाथ कोविंद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणतज्ज्ञ, विधितज्ज्ञ, अर्थशास्त्री, समाजसुधारक, पत्रकार, मजूर नेते अशा विविध सामाजिक जबाबदाऱ्या स्वीकारताना राष्ट्रहित सर्वाेच्च मानले. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. बाबासाहेबांची कर्मभूमी महाराष्ट्र असली तरी प्रेरणाभूमी ही बिहार आहे. तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रेरणेने सामाजिक अन्यायाविरुद्धच्या लढ्याला सुरुवात केली. अध्यक्षीय भाषणात भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांनी उपस्थितांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी महापौर प्रवीण दटके यांनी आपले विचार मांडले. यावेळी स्मारक समितीचे सदस्य अ‍ॅड. मा.मा. येवले, अ‍ॅड. आनंद फुलझेले, एन.आर. सुटे, डॉ. राजेंद्र गवई, डॉ. सुधीर फुलझेले, डी.जी. दाभाडे, विलास गजघाटे व्यासपीठावर होते. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले तर आभार विजय चिकाटे यांनी मानले. या प्रसंगी उपस्थितांच्या हस्ते साप्ताहिक रिपब्लिकन संदेशचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंडित सूरमणी प्रभाकर धाकडे यांच्या बुद्ध-भीम गीताने झाली. समारोप राष्ट्रगीताने झाला. (प्रतिनिधी)तर मंत्रिपदाचा राजीनामा देईल - रामदास आठवले यावेळी रामदास आठवले म्हणाले, कोणी कितीही मोठे मोर्चे काढले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायद रद्द होणार नाही. अ‍ॅट्रॉसिटी ह अन्याय करणारा कायदा नसून रक्षण करणारा कायदा आहे. हा कायदा रद्द करण्याची वेळ आलीच तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईल, असे यावेळी त्यांनी जाहीर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाबासाहेबांना, बुद्धाला आणि संविधानाला मानतात. त्यामुळे संविधान कधीच बदलणार नाही. संविधान बललले तर देश बदलेल. दीक्षाभूमीची जागा आता कमी पडू लागली आहे. तेव्हा स्मारक समितीला हवी तितकी जागा सरकारने द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना त्यांनी केली. तसेच सध्या मी केंद्रात तीन वर्ष मंत्री आहे, त्यामुळे स्मारक समितीला जे काही हवे असेल ते त्यांनी मागावे मी देईल, असेही सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काही कविताही सादर केल्या.