शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणीने घोळ वाढणार

By admin | Updated: March 20, 2017 01:55 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गावर येणाऱ्या ६७ मद्य विक्रीच्या दुकानांच्या

राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मद्य दुकानांचा तपासणी अहवाल तयार नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गावर येणाऱ्या ६७ मद्य विक्रीच्या दुकानांच्या (एफएल-२ वाईन शॉप) अंतराची तपासणी करून यादी तयार केली आहे. तपासणी अहवालानुसार बहुतांश दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तपासणी करताना अधिकारी काही दुकानांवर मेहेरबान असल्याचे अहवालावरून दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दारू दुकाने बंद होण्यास १२ दिवसांचा कालावधी उरला असताना, परवान्याच्या नूतनीकरणावर सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही. यावर अधिकारीही बोलण्यास तयार नाहीत. दुकानदार संघटनांच्या याचिकेवर २० मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतरच परवान्याबाबत धोरण स्पष्ट होणार आहे. (प्रतिनिधी) अधिकाऱ्यांचे झुकते माप अधिकाऱ्यांनी व्हेरायटी चौक, पंचशील चौक, छत्रपती चौक, देवनगर, सदर, इंदोरा चौक, कामठी रोड, मानेवाडा रिंगरोड, सक्करदरा, वाठोडा रिंगरोड, क्वेटा कॉलनी, इतवारी, लकडगंज, भंडारा रोड, गणेशपेठ बसस्टॅण्ड चौक, गिट्टीखदान, कोराडी रोड, जरीपटका रिंगरोड, पागलखाना चौक, एलआयसी चौक, मोहननगर, सदर, टेका नाका, नारी, कामठी, सावनेर, खापरखेडा, कळमेश्वर, काटोल, बुटीबोरी, खापरी, हिंगणा, एमआयडीसी या भागातील एफएल-२ दारू दुकानांची तपासणी केली आहे. तपासणी करताना अधिकाऱ्यांनी काही दुकानदारांना अंतरावर झुकते माप दिले आहे. ते का दिले, याचे कारण अधिकाऱ्यांकडे नाही. महामार्गापासून अंतराचा विचार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून दुकानाचे अंतर मोजले आहे. नागपूर जिल्ह्यातील ६७ दुकानांपैकी जरीपटका येथील काही दुकानांचे अंतर हजार मीटरपेक्षा जास्त दाखविले आहे. याशिवाय महामार्गालगत सेवा रस्ता आहे काय? आणि रस्त्याला पर्यायी मार्ग आहे काय? या वर्गवारीत अधिकाऱ्यांनी बहुतांश दुकानदारांना ‘नाही’ असा शेरा दिला आहे. तसेच तपासणी करताना अधिकाऱ्यांनी मनपा हद्द आणि हद्दीबाहेर, याचाही विचार केला आहे. काही दुकानांना अंतरासाठी चुकीचा शेरा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मार्चनंतर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील दारूची दुकाने बंद होणार आहेत. त्यावर परवानाधारक दुकानदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. दुकाने बंद झाल्यानंतर शासनाला जवळपास १० हजार कोटींच्या महसुलाला मुकावे लागेल. त्यानंतरही या गंभीर प्रकरणी अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.