शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पालकांमधील भांडणात निरागस बालके भरडली जातात, हायकोर्टाचे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2022 16:40 IST

प्रकरणातील विभक्त आई-वडील तीन वर्षीय मुलीच्या ताब्यासाठी गेल्यावर्षीपासून भांडत आहेत.

राकेश घानोडे

नागपूर : पालक मतभेदामुळे विभक्त होतात अन् आपापल्या अधिकारांसाठी भांडत राहतात. प्रश्न बालकांच्या ताब्याचा असेल तर, विषय अधिक गंभीर होतो. अशा प्रकरणांत निरागस बालके भरडली जातात, असे डोळ्यांत अंजन घालणारे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.

प्रकरणातील विभक्त आई-वडील तीन वर्षीय मुलीच्या ताब्यासाठी गेल्यावर्षीपासून भांडत आहेत. आधी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मुलीचा ताबा वडिलाकडे दिला. त्यानंतर सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे देण्याचा आदेश दिला. परिणामी, वडिलाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने चिमुकल्या मुलीच्या भावनेचा विचार करता सदर निरीक्षण नोंदवून अशा प्रकरणांमध्ये बालकांचे हित सर्वाधिक महत्वाचे असते, याकडे लक्ष वेधले व त्या दृष्टीकोणातून मुलीचा ताबा आईकडे देण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश योग्य ठरवला.

कोणताही धोका नसेल तर, पाच वर्षाखालील बालकाचा ताबा मिळण्यासाठी आईच पात्र असते. या प्रकरणात प्रश्न मुलीचा आहे. योग्य शारीरिक, मानसिक व भावणिक विकासाकरिता मुलीला आईसोबत ठेवणे आवश्यक आहे. आईकडे ताबा दिल्यामुळे मुलीच्या हिताला बाधा पोहोचेल, हे सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले. मुलीचे वडील अमरावती तर, आई वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ते लग्नानंतर अवघ्या चार वर्षात विभक्त झाले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयMumbai High Court Nagpur Benchमुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ