शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

माहिती, ज्ञान विज्ञानाचा वापर इतरांना दुखावण्यासाठी नको : पद्मभूषण माधव गाडगीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:13 IST

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृती कारवायांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीवर चिंता व्यक्त केली. उद्योगांच्या अनधिकृती कारवायांद्वारे पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा प्रामाणिक अहवाल मांडणे आवश्यक आहे. माहिती, ज्ञान व विज्ञानाचा उपयोग इतरांना काबूत करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी करण्यात येऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ठळक मुद्देनीरीचा ६१ वा स्थापना दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थे(नीरी)चा ६१ वा स्थापना दिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या समारोहात उपस्थित नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (एनसीसीएस), पुणेचे मुख्य वैज्ञानिक पद्मभूषण प्रा. माधव गाडगीळ यांनी उद्योगांच्या अनधिकृती कारवायांमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानीवर चिंता व्यक्त केली. उद्योगांच्या अनधिकृती कारवायांद्वारे पर्यावरणावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा प्रामाणिक अहवाल मांडणे आवश्यक आहे. माहिती, ज्ञान व विज्ञानाचा उपयोग इतरांना काबूत करण्यासाठी किंवा दुखावण्यासाठी करण्यात येऊ नये, असे प्रतिपादन त्यांनी केले.नीरीच्या स्थापना दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते. याप्रसंगी सीएसआयआरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शेखर मांडे, सीएसआयआर-आयएमएमटीचे संचालक डॉ. सुधासत्व बसू, वातावरण बदल व कौशल्य विभागाचे मुख्य वैज्ञानिक डॉ. जे.एस. पांडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रा. गाडगीळ यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केल्यास भारत जगाचे नेतृत्व करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. समाजात ज्ञानाचे महत्त्व मोठे आहे, पण ते सत्यावर आधारित असावे. देशातील उद्योगांनी नैसर्गिक स्रोतांची काळजी घेणे आवश्यक आहे. असंख्य अनधिकृत कामातून निसर्गाला हानी पोहोचविली जात आहे. देशातील वैज्ञानिकांनी हा रिपोर्ट प्रामाणिकपणे मांडणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मानवी वस्तीनुसार नैसर्गिक स्रोत व्यवस्थापनाची गरज त्यांनी अधोरेखित केली. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कम्युनिटी फॉरेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम विकसित करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शासनात लोकसहभाग, सहकारातून आर्थिक उद्योग व समन्वयातून ज्ञानाचे व्यवस्थापन केले तरच विकास साधणे शक्य असल्याचे स्पष्ट मत त्यांनी मांडले. डॉ. राकेश कुमार यांनी संस्थेच्या कामाबाबत माहिती दिली.यादरम्यान ‘पर्यावरण टिकविण्याची आव्हाने’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये एमपीसीबीचे चेअरमेन सुधीर श्रीवास्तव, स्मार्ट सिटी, नागपूरचे सीइओ रामनाथ सोनवाणे, स्वच्छ गंगा राष्ट्रीय  मिशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजीव रंजन मिश्रा, सीएसआयआरचे संचालक डॉ. राकेश कुमार, सीपीसीबीचे माजी चेअरमन प्रा. एस.पी. गौतम, डॉ. विक्रम पत्तरकिने, वंदना मेहरा, राजुल पारिख, डॉ. एच.जे. पुरोहित, डॉ. अत्या कपले यांचा सहभाग होता.भव्य विज्ञान प्रदर्शननीरीच्या स्थापना दिनाच्या दिवशी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्र तसेच वेस्ट मॅनेजमेंट पार्कचे उद््घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात आले. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेलसह प्रदर्शनात सहभाग घेतला. प्रदर्शन पाहण्यासाठीही मोठ्या संख्येत विद्यार्थी उपस्थित झाले होते. प्रदर्शनातील उत्कृष्ट विज्ञान मॉडेल्सला बक्षीस देण्यात आले. यावेळी सीएसआयआर-नीरीच्या डॉ. पी.व्ही. निधीश, डॉ. लीना देशपांडे, दीपक बडगे, आशुतोष मंडपे, रश्मी डहाके या अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.

 

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान