शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

माहिती आयुक्त मिळेना !

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे.

अर्जदार त्रस्त : प्रलंबित अपिलांची संख्या वाढलीऔरंगाबादच्या आयुक्तांकडे प्रभारनागपूर : भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या राज्य माहिती आयुक्तांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अपिलांवर सुनावणी होणार कशी? परिणामी प्रलंबित अपिलांची संख्या वाढली आहे.माहिती अधिकाराबाबत नागरिक आता जागरूक होऊ लागले आहेत. नागरिकांच्या आवश्यकतेसाठी अनेक कार्यकर्ते माहिती अधिकाराचा वापर करू लागले आहे. यापैकी बहुतेकांना पहिल्या प्रयत्नात माहिती नाकारण्याचेच प्रकार अधिक होत असतात. माहिती दिलीच तर ती अर्धवट देण्याचे प्रकारही घडतात. अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी आणि अर्जदाराला योग्य माहिती मिळावी या उद्देशाने राज्य माहिती आयोगाकडे अपिल सादर करता येते. आयोग यावर सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय देतात. यात अर्जदाराला न्याय मिळतो. संबंधित दोषी अधिकार्‍यावर कारवाईची शिफारस केली जाते. नागपूर हे विभागीय केंद्र आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांचा यात समावेश होतो. इतकेच नव्हे तर नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचेही शहर आहे. त्यामुळे राज्य माहिती आयोगाचे खंडपीठ नागपुरात स्थापित करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत नागपूरच्या माहिती आयुक्तांकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी असायची परंतु सध्या नागपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून माहिती आयुक्तच नाही. त्यामुळे अपिलांवर सुनावणी प्रलंबित असल्याने अर्जदार त्रस्त झाले आहे. यातूनच घाट रोड येथील अंकित अरविंद जालान नावाच्या एका अर्जदारांने माहिती आयोगाकडेच एकूण अपिलांबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना १९ जुलै २0१३ पासून नागपुरात माहिती आयुक्तांचे पद रिक्त असल्याची माहिती खुद्द राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाचे जन माहिती अधिकारी अ.र. कारदार यांनी दिली आहे. मार्च २0१३ ते मार्च २0१४ या एका वर्षात तब्बल १९४८ अपील प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)■ नागपूरच्या माहिती आयुक्तांचा भार औरंगाबाद येतील माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात येऊन पाच दिवस सुनावणी घेतली होती. त्यात २00 वर प्रकरणे त्यांनी निकाली काढली. परंतु आपले नियमित काम सोडून त्यांना नागपूरला वारंवार येणे शक्य नाही.