शहरं
Join us  
Trending Stories
1
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
2
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
3
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
4
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
5
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
6
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
9
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
10
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
11
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
12
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
13
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
15
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
20
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार

माहिती आयुक्त मिळेना !

By admin | Updated: May 9, 2014 02:20 IST

भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे.

अर्जदार त्रस्त : प्रलंबित अपिलांची संख्या वाढलीऔरंगाबादच्या आयुक्तांकडे प्रभारनागपूर : भ्रष्टाचारावर नियंत्रण बसवण्यासाठी माहितीचा अधिकार कायदा हे एक प्रभावी शस्त्र ठरले आहे. परंतु या शस्त्राचा उपयोग करून समाजात जागृती करणारे अर्जदार नागरिक सध्या त्रस्त झाले आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या राज्य माहिती आयुक्तांचे पद गेल्या वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अपिलांवर सुनावणी होणार कशी? परिणामी प्रलंबित अपिलांची संख्या वाढली आहे.माहिती अधिकाराबाबत नागरिक आता जागरूक होऊ लागले आहेत. नागरिकांच्या आवश्यकतेसाठी अनेक कार्यकर्ते माहिती अधिकाराचा वापर करू लागले आहे. यापैकी बहुतेकांना पहिल्या प्रयत्नात माहिती नाकारण्याचेच प्रकार अधिक होत असतात. माहिती दिलीच तर ती अर्धवट देण्याचे प्रकारही घडतात. अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हावी आणि अर्जदाराला योग्य माहिती मिळावी या उद्देशाने राज्य माहिती आयोगाकडे अपिल सादर करता येते. आयोग यावर सुनावणी घेऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून योग्य निर्णय देतात. यात अर्जदाराला न्याय मिळतो. संबंधित दोषी अधिकार्‍यावर कारवाईची शिफारस केली जाते. नागपूर हे विभागीय केंद्र आहे. नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यांचा यात समावेश होतो. इतकेच नव्हे तर नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचेही शहर आहे. त्यामुळे राज्य माहिती आयोगाचे खंडपीठ नागपुरात स्थापित करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत नागपूरच्या माहिती आयुक्तांकडे संपूर्ण विदर्भाची जबाबदारी असायची परंतु सध्या नागपूरसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गेल्या वर्षभरापासून माहिती आयुक्तच नाही. त्यामुळे अपिलांवर सुनावणी प्रलंबित असल्याने अर्जदार त्रस्त झाले आहे. यातूनच घाट रोड येथील अंकित अरविंद जालान नावाच्या एका अर्जदारांने माहिती आयोगाकडेच एकूण अपिलांबाबत विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना १९ जुलै २0१३ पासून नागपुरात माहिती आयुक्तांचे पद रिक्त असल्याची माहिती खुद्द राज्य माहिती आयोग नागपूर खंडपीठाचे जन माहिती अधिकारी अ.र. कारदार यांनी दिली आहे. मार्च २0१३ ते मार्च २0१४ या एका वर्षात तब्बल १९४८ अपील प्रलंबित आहेत. (प्रतिनिधी)■ नागपूरच्या माहिती आयुक्तांचा भार औरंगाबाद येतील माहिती आयुक्त डी.बी. देशपांडे यांच्याकडे आहे. त्यांनी फेब्रुवारी महिन्यात नागपुरात येऊन पाच दिवस सुनावणी घेतली होती. त्यात २00 वर प्रकरणे त्यांनी निकाली काढली. परंतु आपले नियमित काम सोडून त्यांना नागपूरला वारंवार येणे शक्य नाही.