शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

कोरोनाकाळात माहिती आयोगाची गती मंदावली; तीन महिन्यांपासून एकही तक्रार निकाली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 10:14 IST

Nagpur News मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागल्यानंतर राज्य माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाची गती मंदावली आहे.

ठळक मुद्देमार्च २०२० च्या तुलनेत नागपूर खंडपीठातील प्रलंबित अपिलांची संख्या ६१ टक्क्यांनी वाढली

 

योगेश पांडे

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा राज्य माहिती आयोगाच्या कार्यप्रणालीलादेखील फटका बसला आहे. मार्च २०२० पासून लॉकडाऊन लागल्यानंतर आयोगाच्या नागपूर खंडपीठाच्या कामाची गती मंदावली आहे. तेव्हाच्या तुलनेत प्रलंबित द्वितीय अपिलांच्या संख्येत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत एकही तक्रार निकाली काढण्यात आलेली नाही. अशा स्थितीत माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणार कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मार्च २०२० मध्ये २ हजार २६१ द्वितीय अपिले प्रलंबित होती. लॉकडाऊन लागल्यानंतर आयोगाचे काम ऑनलाईन माध्यमातून चालले. कोरोनाचा काळ असला तरी दर महिन्यात दाखल होणाऱ्या द्वितीय अपिलांची संख्या सरासरी दोनशेहून अधिक होती. मात्र त्या तुलनेत अपिलांना निकाली काढण्याचे प्रमाण कमी होते. डिसेंबर २०२० च्या अखेरीस प्रलंबित प्रकरणांची संख्या २ हजार ८०२ इतकी होती. तर मे २०२१ महिन्यात हाच आकडा साडेतीन हजारांच्या पार गेला. मे महिन्यात २२९ द्वितीय अपिले दाखल झाली व ३१ अपिले निकाली काढण्यात आली. महिन्याअखेर ३ हजार ६४६ अपिले प्रलंबित होती.

तक्रारी निकाली काढणेच थांबले

मार्च २०२० मध्ये नागपूर खंडपीठाकडे ७५५ तक्रारी प्रलंबित होत्या. एप्रिल २० ते जून २० या कालावधीत एकही तक्रार निकाली निघाली नाही. ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० या कालावधीतदेखील एकही तक्रार निकाली काढण्यात आली नाही. डिसेंबर २०२० मध्ये २५ नवीन तक्रारी दाखल झाल्या व एकूण ८७५ तक्रारी प्रलंबित होत्या. या वर्षी मार्च ते मे २०२० या कालावधीतदेखील एकही तक्रार निकाली निघाली नाही. मे महिन्याच्या अखेरीस ९५९ तक्रारी प्रलंबित होत्या.

संथ काम पण इतरांच्या तुलनेत बरा कारभार

नागपूर खंडपीठातील काम संथ असले तरी इतर खंडपीठांच्या तुलनेत बरा कारभार असल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होत आहे. मे महिन्याच्या अखेरीस नागपूर खंडपीठात सर्वात कमी द्वितीय अपिले प्रलंबित होती. तर प्रलंबित तक्रारींत आठ खंडपीठांमध्ये नागपूर खंडपीठाचा पाचवा क्रमांक होता.

 

 

टॅग्स :Governmentसरकार