शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

रेल्वेगाड्या वाढताना दलाल अन् असामाजिक तत्त्वांचा शिरकाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 21:53 IST

रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांसाठी चिंता : सुरक्षा यंत्रणांनी बंदोबस्त करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वे बोर्डाच्या वतीने पूर्वी विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येत होत्या. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांची संख्या वाढली असताना रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल आणि असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दलाल आणि असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.रेल्वेगाड्यांची संख्या हळूहळू वाढत आहे. पूर्वी रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. त्यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली आहे. कोरोनामुळे अत्यावश्यक काम असल्यामुळे प्रवासी प्रवास करीत आहेत. रेल्वेगाड्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. याचा फायदा रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दलाल घेत आहेत. बनावट आयडी तयार करून ते प्रवाशांना रेल्वे प्रवासाचे तिकीट उपलब्ध करून देत आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रवाशाकडून २०० ते ३०० रुपये अधिक घेऊन प्रवाशांची लूट सुरू आहे. मंगळवारीच रेल्वे सुरक्षा दलाने एका दलालाला अटक करून त्याच्याकडून रेल्वे तिकिटे जप्त केली आहेत. अजूनही शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार सुरु असून रेल्वे सुरक्षा दल दलालांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे रेल्वेस्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत असताना असामाजिक तत्त्व सक्रि य झाले आहेत. प्रवाशांची दिशाभूल करून ते त्यांची लूट करीत आहेत. चार दिवसांपूर्वी एका असामाजिक तत्त्वाने तिकिटाची नोंद करायची असल्याचे सांगून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांचे तिकीट रद्द करून त्यांच्या तिकिटांची रक्कम पळविली होती. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्र्ग पोलिसांनी असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.आरक्षण कार्यालयात हवी पोलिसांची ड्युटीआरक्षण कार्यालयात तिकीट काढण्यासाठी प्रवाशांची रांग असते. गर्दीचा फायदा घेऊन असामाजिक तत्त्व प्रवाशांचे पाकीट, महागडे मोबाईल चोरी करतात. परंतु रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलीस आरक्षण कार्यालयात ड्युटीवर राहत नसल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावते. त्यामुळे आरक्षण कार्यालयात आरपीएफ जवान, लोहमार्ग पोलिसांची ड्युटी लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरCrime Newsगुन्हेगारी