शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र, बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
3
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
4
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
5
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
6
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
7
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
8
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
9
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
10
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
11
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
12
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
13
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
14
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
15
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
16
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
17
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
18
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
19
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
20
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

संत्रा, माेसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात फळमाशी, ब्राऊन राॅट व कॉलेटोट्रायकम या किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करूनही कीड व राेग नियंत्रणात येत नसल्याने तसेच माेठ्या प्रमाणात फळगळ वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत.

दाेन्ही तालुक्यांमध्ये संत्रा व माेसंबीच्या बागांवर या किडी व राेगांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने शेतकऱ्यांना बागा जगवण्यासाठी व त्यातून उत्पादन घेण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत असून, खर्च करावा लागत आहे. या राेगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात फळे गळायला सुरुवात हाेते. ही फळगळ थांबविण्यासाठी महागड्या कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी केल्यानंतरही राेग व किडी नियंत्रणात येत नाही, अशी माहिती संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली.

या कीड व राेगामुळे दाेन वर्षांपासून फळगळ हाेत असून, माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याची माहिती मनोहर चौधरी, ईश्वर पुंड, नितीन राठी, चंद्रशेखर बेलखेडे, राजेश मक्कर, गोपाल गुप्ता, मनीष हरजाल, विशाल वानखेडे, मोहन चरडे, अनिल सोनक, जगदीश बेले, जितेंद्र कोतेवार, विक्रम वानखेडे, राजेश जयस्वाल, भूषण ठाकूर, वैभव काळे, आशिष कडू या संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली. बागा वाचविण्यासाठी ही महागडी औषधे शासनाने अनुदानावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

..

‘जीएम सीड’ परवानगी द्या

कपाशीवर गुलाबी बाेंडअळी, तर साेयाबीनवर खाेडमाशी व यल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव हाेत असल्याने ही दाेन्ही नगदी पिके मागील काही वर्षांपासून हातची जात आहे. पिकांना वाचविण्याच्या प्रयत्नात उत्पादनखर्च वाढत असून, उत्पादन घटत आहे तसेच पिकांचा दर्जाही खालावत आहे. देशात उपलब्ध आलेली या दाेन्ही पिकांवर बियाणे किडींना प्रतिबंधक राहिली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने ‘जीएम सीड’ला परवानगी द्यावी, अशी मागणी मदन कामडे, परिक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

संत्रा, मोसंबीवर चट्टे पडून फळ देठापासून कमकुवत हाेते व गळायला सुरुवात हाेते. बाग साफ करणे, औषधांची फवारणी करणे, पाण्याचा याेग्य निचरा हाेईल याची काळजी घेणे यासह कृषितज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययाेजना केल्या. पण फळगळ थांबली नाही.

- वैभव काळे, शेतकरी

...

मागील काही वर्षांपासून फळमाशी व बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला आहे. पूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधे दिली जायची. ही याेजना बंद केल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांना भेटून निवेदन दिले व पत्रव्यवहार केला. परंतु, उपयाेग झाला नाही. शासनाने ही याेजना पुन्हा सुरू करायला पाहिजे.

- डाॅ. अनिल ठाकरे, शेतकरी

...

वातावरणातील बदल किडी व बुरशीजन्य राेगाच्या पथ्यावर पडतात. कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- सुरेश कन्नाके,

तालुका कृषी अधिकारी, काटाेल

...

200821\img-20210819-wa0191.jpg~200821\img-20210808-wa0188.jpg

काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ~काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ