शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

संत्रा, माेसंबीवर फळमाशीचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:13 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : वातावरणातील प्रतिकूल बदल तसेच कीड व राेगांना प्रतिबंधक नसलेल्या कलमांमुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील संत्रा व माेसंबीच्या बागांवर माेठ्या प्रमाणात फळमाशी, ब्राऊन राॅट व कॉलेटोट्रायकम या किडी व बुरशीजन्य राेगांचा प्रादुर्भाव झाला आहे. कीटक व बुरशीनाशकांची फवारणी करूनही कीड व राेग नियंत्रणात येत नसल्याने तसेच माेठ्या प्रमाणात फळगळ वाढल्याने शेतकरी चिंतित आहेत.

दाेन्ही तालुक्यांमध्ये संत्रा व माेसंबीच्या बागांवर या किडी व राेगांचा प्रादुर्भाव हाेत असल्याने शेतकऱ्यांना बागा जगवण्यासाठी व त्यातून उत्पादन घेण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत असून, खर्च करावा लागत आहे. या राेगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर माेठ्या प्रमाणात फळे गळायला सुरुवात हाेते. ही फळगळ थांबविण्यासाठी महागड्या कीटकनाशके व बुरशीनाशकांची फवारणी केल्यानंतरही राेग व किडी नियंत्रणात येत नाही, अशी माहिती संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली.

या कीड व राेगामुळे दाेन वर्षांपासून फळगळ हाेत असून, माेठे आर्थिक नुकसान हाेत असल्याची माहिती मनोहर चौधरी, ईश्वर पुंड, नितीन राठी, चंद्रशेखर बेलखेडे, राजेश मक्कर, गोपाल गुप्ता, मनीष हरजाल, विशाल वानखेडे, मोहन चरडे, अनिल सोनक, जगदीश बेले, जितेंद्र कोतेवार, विक्रम वानखेडे, राजेश जयस्वाल, भूषण ठाकूर, वैभव काळे, आशिष कडू या संत्रा व माेसंबी उत्पादकांनी दिली. बागा वाचविण्यासाठी ही महागडी औषधे शासनाने अनुदानावर उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

..

‘जीएम सीड’ परवानगी द्या

कपाशीवर गुलाबी बाेंडअळी, तर साेयाबीनवर खाेडमाशी व यल्लाे माेझॅकचा प्रादुर्भाव हाेत असल्याने ही दाेन्ही नगदी पिके मागील काही वर्षांपासून हातची जात आहे. पिकांना वाचविण्याच्या प्रयत्नात उत्पादनखर्च वाढत असून, उत्पादन घटत आहे तसेच पिकांचा दर्जाही खालावत आहे. देशात उपलब्ध आलेली या दाेन्ही पिकांवर बियाणे किडींना प्रतिबंधक राहिली नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने ‘जीएम सीड’ला परवानगी द्यावी, अशी मागणी मदन कामडे, परिक्षित चरपे, संदीप सेंबेकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

...

संत्रा, मोसंबीवर चट्टे पडून फळ देठापासून कमकुवत हाेते व गळायला सुरुवात हाेते. बाग साफ करणे, औषधांची फवारणी करणे, पाण्याचा याेग्य निचरा हाेईल याची काळजी घेणे यासह कृषितज्ज्ञांनी सांगितलेल्या उपाययाेजना केल्या. पण फळगळ थांबली नाही.

- वैभव काळे, शेतकरी

...

मागील काही वर्षांपासून फळमाशी व बुरशीजन्य राेगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे जमिनीचा पाेत खालावत चालला आहे. पूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर औषधे दिली जायची. ही याेजना बंद केल्याने कृषिमंत्री दादा भुसे यांना भेटून निवेदन दिले व पत्रव्यवहार केला. परंतु, उपयाेग झाला नाही. शासनाने ही याेजना पुन्हा सुरू करायला पाहिजे.

- डाॅ. अनिल ठाकरे, शेतकरी

...

वातावरणातील बदल किडी व बुरशीजन्य राेगाच्या पथ्यावर पडतात. कृषी विभागाच्या वतीने ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.

- सुरेश कन्नाके,

तालुका कृषी अधिकारी, काटाेल

...

200821\img-20210819-wa0191.jpg~200821\img-20210808-wa0188.jpg

काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ~काटोल तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी गळ