शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

निकृष्ट सोयाबीनमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

नागपूर : यावर्षी जून आणि जुलै महिन्यात गेल्यावर्षीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असला तरीही दिवाळीपूर्वी मुहूर्तावर ...

नागपूर : यावर्षी जून आणि जुलै महिन्यात गेल्यावर्षीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल ७५०० रुपयांपर्यंत भाव मिळत असला तरीही दिवाळीपूर्वी मुहूर्तावर ४५०० रुपये आणि नंतर सोयाबीन कमी दर्जाचे व ओले असल्याच्या कारणाने शेतकऱ्यांना ३ हजारांखाली भाव मिळाला होता. आता मुख्य बाजारपेठांमध्ये फार कमी शेतकरी आणि जास्त व्यापारी सोयाबीन विक्रीला आणत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना जास्त फायदा तर शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. अशीच स्थिती महाराष्ट्रातील सर्वच बाजारपेठांमध्ये आहे.

सोयाबीनवर किडीचा प्रादुर्भाव

गेल्यावर्षी भाव कमी मिळाल्याने यंदा जास्त शेतकरी कापसाकडे वळले आहेत. गेल्यावर्षी नागपूर विभागात २ लाख ९७ हजार ४२२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली होती. यानुसार आठ विभागात एकूण ४३ लाख २३ हजार ७०७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली होती. यंदाच्या सोयाबीन पिकाची एकूण आकडेवारी सप्टेंबर महिन्याअखेर जाहीर होणार आहे. अधिकारी म्हणाले, गेल्यावर्षी सोयाबीन कापणीला येण्याआधी मूळकुज व खोरकीड या किडीचा प्रादुर्भाव आणि येलोमोझॅक हा बुरशीजन्स रोग सोयाबीनवर आल्याने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. किडीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सल्फरची आवश्यकता असते, पण मातीत सल्फरचे प्रमाण कमी झाल्याने गेल्या काही वर्षांपासून किडीचा प्रादुर्भाव वाढतच आहे. याशिवाय परतीच्या पावसामुळे शेतातील पीक खराब झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना ओल्या पिकाची कापणी करावी लागली होती. त्याचा दर्जाही निकृष्ट होता. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. साठवणीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी जास्त भाव मिळाल्यानंतरच जून आणि जुलै महिन्यात विक्रीला आणले. दरवर्षी उतारा कमी होत असल्याने नागपूर विभागात गेल्यावर्षीच्या ३ लाख हेक्टरच्या तुलनेत २ लाख हेक्टर शेतजमिनीवर लागवड होणार असल्याची माहिती आहे.

जून, जुलैमध्ये भाववाढीची कारणे

उत्तम दर्जाच्या सोयाबीनचे उत्पादन कमी झाल्याने ऑईल मिलर्सला चांगल्या प्रतीचे सोयाबीन कमी मिळाले. त्याच कारणामुळे दिवाळीत ९५ रुपये किलो असलेल्या सोयाबीनचे दर जून महिन्यात १६५ रुपयांवर पोहोचले होते. आता कच्च्या सोयाबीन तेलाची आयात सुरू झाल्यानंतर भाव १५५ रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. ऑईल मिलर्सनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आयात केली. हेसुद्धा दर्जेदार सोयाबीनच्या दरवाढीसाठी कारणीभूत आहे. नागपूर विभागात कळमना बाजारात दररोज ७०० ते ८०० क्विंटल सोयाबीनची आवक आहे.

सोयाबीनचा पेरा वाढणार

गेल्यावर्षी तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा वाढणार आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. त्यांना बियाणे उपलब्ध करून दिली असून शेतकऱ्यांसाठी बीज उत्पादकता कार्यक्रम राबविला आहे.

मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, नागपूर जिल्हा.

सोयाबीनला भाव कमी मिळाला

गेल्यावर्षी सोयाबीनचा दर्जा निकृष्ट असल्याने शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला. दर्जेदार सोयाबीनची साठवण केलेल्या शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त भाव मिळत आहे. बाजारात पूर्वीच्या तुलनेत आवक फारच कमी आहे.

अतुल सेनाड, अध्यक्ष, कळमना उत्पन्न कृषी धान्य बाजार.

वर्ष २०२० मध्ये विभागनिहाय हेक्टरवर सोयाबीन पेरणी :

कोकणशून्य हेक्टर

नाशिक१,४६,५२५

पुणे१,८०,७५८

कोल्हापूर १,५९,५४९

औरंगाबाद४,०६,७१३

लातूर १७,१७,१५०

अमरावती१४,१५,५९०

नागपूर २,९७,४२२