शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
2
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
3
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
4
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
5
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
6
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
7
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
8
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
9
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
10
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
11
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
12
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
13
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
14
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
15
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
16
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
17
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
18
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
19
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!
20
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट

आदिवासी क्षेत्रात कृषी मालावर आधारित उद्योग हवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशातील कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्र हे मागासलेले आहे. या क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कृषी मालावर आधारित उद्योग ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रात सुरू झाले तर अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो व शाश्वत विकास साध्य केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. जागतिक एमएसएमई दिनानिमित्त इंडियन बँकेच्या एमएसएमई प्रेरणा या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते.

देशासमोर आज गरिबी, उपासमार आणि बेरोजगारीचे मोठे आव्हान उभे आहे. ही समस्या दूर करण्यासाठी रोजगार निर्मितीशिवाय पर्याय नाही. रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता, नवीन उद्योग सुरू करणाऱ्या व कौशल्य आणि जिद्द असलेल्या उद्योजक तरुणांच्या मागे मदतीसाठी बँकांनी उभे राहण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. पण त्याची अंमलबजावणी करताना गती हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. पारदर्शकता, भ्रष्टाचारमुक्त प्रणाली, कमी वेळात निर्णय पद्धती अवलंबिणे आवश्यक आहे, असे गडकरी म्हणाले. एमएसएमई हा सध्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील आर्थिक, सामाजिक परिवर्तनामध्ये एमएसएमईचा मोठा सहभाग आहे. एमएसएमईचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ३० टक्के आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.