शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 02:30 IST

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे.

संवादातून उभारता येईल भारत-पाक मैत्रीचा सेतूपाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित : ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजननागपूर : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध सुधारावे ही तेथील जनतेचीदेखील इच्छा आहे. दोघांमधील संबंध सुधारण्यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘लोकमत नॉलेज फोरम’अंतर्गत आयोजित ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’ या विशेष चर्चासत्रादरम्यान मुख्य वक्ता म्हणून ते शुक्रवारी बोलत होते.भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालणाऱ्या शांतिप्रक्रियेला वैचारिक बळ प्रदान करण्यासाठी आयोजित या चर्चासत्राला थायलंड, म्यानमार व अफगाणिस्तान येथील भारताचे माजी राजदूत विवेक काटजू, भाजपाच्या विदेश घडामोडी विभागाचे अध्यक्ष शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.भारत पाकिस्तानदरम्यान शांतिवार्ता होणे आवश्यक आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.जतीन देसाई म्हणाले, दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले. ‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रोडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले. मुख्य समारंभानंतर यावेळी विशेष चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते.विजय दर्डा यांची सूचना स्वागतार्ह ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.शेषाद्री चारी, काँग्रेसच्या वरिष्ठ प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी, ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई हे प्रामुख्याने उपस्थित होते.भारत पाकिस्तानदरम्यान शांतिवार्ता होणे आवश्यक आहे. पाकिस्तानमधील काही शक्तींना वाटते की चर्चा व्हायला नको आणि तेथील अस्थिर व्यवस्थेमुळे नेमके कुणाशी बोलावे असा भारतासमोर संभ्रम निर्माण होतो, असे प्रतिपादन शेषाद्री चारी यांनी केले. दोन्ही देशांनी त्यांचे समान हित कशात आहे हे शोधून वाटचाल करणे हाच शांतता निर्माण करण्याचा उपाय आहे, असे स्पष्ट मत विवेक काटजू यांनी व्यक्त केले. गेल्या ६९ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. आता त्याहून पुढे जाऊन विचार करायला हवा. संबंध सुधारण्यासाठी चर्चेसोबतच हिंदी सिनेमा, संंस्कृती यांच्यासारख्या बाबींचादेखील उपयोग व्हायला हवा, असे प्रियंका चतुर्वेदी यावेळी म्हणाल्या.जतीन देसाई म्हणाले, दोन्ही देशांना जवळ आणण्यासाठी जनतेमधील परस्पर संबंध वाढवायला हवे. नागरिकांना मिळणाऱ्या ‘व्हिसा’ची संख्या वाढवायला हवी. भारत आणि पाकिस्तान या देशांच्या भांडणातून दोन्ही देशांचे खूप मोठं नुकसान झालं आहे. संवाद आणि चर्चेतूनच भारत-पाकदरम्यान संबंध सुधारू शकतात,' असे मत लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांनी प्रास्ताविकादरम्यान व्यक्त केले. ‘लोकमत’चे ‘नॅशनल एडिटर’ हरीश गुप्ता यांनी यावेळी जनतेच्यावतीने मान्यवरांना विविध प्रश्न विचारले. ‘लोकमत समाचार’चे ‘प्रोडक्ट हेड’ मतिन खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर ‘लोकमत समाचार’चे संपादक विकास मिश्रा यांनी आभार मानले. मुख्य समारंभानंतर यावेळी विशेष चर्चासत्राचे आयोजनही करण्यात आले होते.विजय दर्डा यांची सूचना स्वागतार्ह ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा सदस्य खासदार विजय दर्डा यांच्या संकल्पनेतून नागपुरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अब्दुल बासित यांनी कौतुक केले. विजय दर्डा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यासोबत मोरोक्को दौऱ्यावर असल्यामुळे ते उपस्थित नाहीत. त्यांची अनुपस्थिती जाणवते आहेच. विजय दर्डा पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेले असताना दोन्ही देशांनी एकत्रित येऊन एका मनोरंजन वाहिनीची सुरुवात करावी, अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेचे स्वागत करून यासाठी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.